शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजप संपर्कात असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या दाव्यानंतर दानवे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 20:30 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजपने माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केलाय, असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होते.

मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी द रिट्रीट हॉटेलमध्ये जाऊन सर्व आमदारांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपही आपल्या संपर्कात असल्याचं विधान केलं होते. मात्र शिवसेनेचे आमदार विचलित होऊ नयेत म्हणून उद्धव ठाकरे भाजप संपर्कात असल्याचे सांगत असल्याचे भाजपचे खासदार रावसाहेब दानवे म्हणाले आहे. एका वृत्तवाहिनीला प्रतिकिया देताना ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेना सत्तास्थापना करतील असा अंदाज होता. मात्र मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरून ही दोन्ही पक्ष दुरावली आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठींबा घेऊन शिवसेना सत्तास्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला होता. मात्र राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत शिवसेना इतर पक्षाचे पाठिंब्याचे पत्र सादर करू न शकल्याने सत्तास्थापनेचा दावा सेनेला करता आला नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यांची आणि आमदारांची चिंता वाढली असल्याचे बोलले जात होते.

मात्र मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी द रिट्रीट हॉटेलमध्ये जाऊन शिवसेना आमदारांची भेट घेतली. राष्ट्रपती राजवटीनं घाबरून जाऊ नका, खचून जाऊ नका. आपण लवकरच सत्ता स्तापन करणार आहोत, असं सांगतानाच भाजपने माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केलाय, असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होते. मात्र दानवे यांनी उद्धव यांचा हा दावा फेटाळून लावला आहे.

भाजप शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे उद्धव कोणत्या आधारे बोलले हे मला सांगता येणार नाही. तसेच याबाबतीत मला काही महिती मिळाली नसल्याचे दानवे म्हणाले. मात्र शिवसेनेचे आमदार विचलित होऊ नयेत, तसेच त्यांचा उत्साहा वाढवा म्हणून भाजपकडून संपर्क साधला जात असल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरेंकडून केले जात असल्याचे दानवे म्हणाले. त्यामुळे आता शिवसेना यावर काय प्रतिकिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार