शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: “ठाकरे सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलतेय, आता आढेवेढे न घेता मराठा समाजाला न्याय द्यावा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 11:50 IST

Maratha Reservation: मराठा समाज आता कोणतीच टोलवा टोलवी सहन करणार नाही, अशा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देआता कोणतेही आढेवेढे न घेता मराठा समाजाला न्याय द्यावासर्वांत आधी मराठा समाजाला मागास सिद्ध करणे आवश्यकआमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप आमने-सामने उभे ठाकले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. यातच आता, ठाकरे सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलत असून, आता कोणतेही आढेवेढे न घेता मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्रही लिहिले आहे. (rana jagjit singh patil wrote letter to cm uddhav thackeray about maratha reservation)

महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का होऊ शकला नाही? नितीन गडकरींचे सूचक उत्तर

भाजपचे तुळजापूर उस्मानाबादचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीन करण्याविषयी पत्र पाठवले आहे. मराठा समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी शिस्तबद्ध मूक मोर्चे काढून एक आदर्श निर्माण केला आहे. संयमी नेतृत्वाला साद घातल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मराठा समाजाला १३ टक्के आरक्षण दिले आणि ते मुंबई उच्च न्यायालयात टिकेलही. राज्य सरकारला एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकारच नाही, असे कारण पुढे केले जात आहे. मात्र, घटनेतील १२७ व्या दुरुस्तीनुसार आता ते अधिकार राज्य सरकारला मिळाले आहेत, असे पाटील म्हणाले. 

‘सरकार’ आहे की ‘सर्कस’? तुमच्या कोलांट उड्यांना जनता त्रासलीय; भाजपची टीका

आता आढेवेढे न घेता मराठा समाजाला न्याय द्यावा

राज्य सरकारने कुठलेही आढेवेढे न घेता अथवा कारणे सांगण्यात वेळ न घालवता मराठा समाजाला न्याय देण्यासाठी तातडीने कार्यवाही अनुसरणे आवश्यक आहे. कारण आताही आपण ५० टक्के मर्यादेवर बोट ठेवत परत केंद्र सरकारवरच जबाबदारी ढकलत आहात, अशी टीका पाटील यांनी केली आहे. तसेच आपल्या सरकारने मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी कुठलेच पाऊल उचलेले नाही, तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी परिस्थिती कशी सिद्ध होईल. यावरून राज्य सरकारला मराठा आरक्षण न्यायालयीन कचाट्यात अडकावायचे आहे का, अशी शंका पाटील यांनी या पत्रात उपस्थित केली आहे. 

“देशात सध्या वैचारिक दहशतवाद, देश तोडण्याचा काही जण प्रयत्न करतायेत”: बाबा रामदेव

सर्वांत आधी समाजाला मागास सिद्ध करणे आवश्यक

सर्वांत आधी मराठा समाजाला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास सिद्ध करणे आवश्यक आहे. आता गठीत करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगात मराठा समाजाला किती प्रतिनिधीत्व आहे, याचा विचार होणे गरजेचे आहे. गायकवाड आयोगात मराठा समाजाला प्रतिनिधीत्व असल्यामुळे तत्कालीन फडणवीस सरकारला मराठा समाजाचा इंपेरियल डेटा गोळा करून मागास ठरवता येणे शक्य झाले. गायकवाड आयोग वगळता आतापर्यंत जेवढेही आयोग स्थापन करण्यात आले, त्यांना मराठा समाजाला मागास ठरवता आले नव्हते, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. मराठा समाजाला न्याय देणे ही सर्वस्वी आता राज्य सरकारची जबाबदारी आहे. मराठा समाज आता कोणतीच टोलवा टोलवी सहन करणार नाही. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तत्परतेने मराठा समाजाच्या मागास असण्याच्या संदर्भातील शास्त्रीय डेटा गोळा करण्यासंबंधी मागासवर्ग आयोगाला निर्देश द्याल व मागासवर्ग आयोगात मराठा समाजाला योग्य ते प्रतिनिधीत्व द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारBJPभाजपाRanajagjitsinha Patilराणा जगजितसिंह पाटीलOsmanabadउस्मानाबादMumbaiमुंबई