शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

माझ्या स्वाभिमानी शिलेदारांनो! राजू शेट्टींचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 6:00 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माझ्या स्वाभिमानी शिलेदारांनो, अशी साद घातली आहे. तसेच भाजमधील पक्षांतरावरही टीका केली आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी राजीनामा देत भाजपाच्या वाटेवर असल्याने राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. तसेच स्वाभिमानीच्या शिलेदारांनी ज्वलंत प्रश्न घेऊन मैदानात उतरण्याचे आवाहन केले आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माझ्या स्वाभिमानी शिलेदारांनो, अशी साद घातली आहे. तसेच भाजमधील पक्षांतरावरही टीका केली आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या प्रचंड राजकीय अस्थैर्य निर्माण झालेले आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बहुतेक सर्वच राजकीय नेते व कार्यकर्ते सत्तेच्या दिशेने पळत सुटताना दिसत आहेत. जे येत नाहीत त्यांच्या मागे चौकशीची ईडापिडा लावली जाते. आर्थिक कोंडी केली जाते आणि त्यानांही नाईलाजाने भरती व्हावे लागते. अशा पध्दतीने महाराष्ट्रात विरोधी पक्ष शिल्लक राहतोय काय नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.देशातील राजकीय वाटचाल एकपक्षीय राजवटीच्या दिशेने निघालेली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

याचबरोबर विरोधी पक्षाची गरज सांगताना त्यांनी सत्ता कोणाचीही असो विरोधी पक्ष हा सर्वसामान्यांचा आधार असतो. तो आधारच काढून घ्यायचे राज्यकर्त्यांनी ठरविलेले दिसते. अशा परिस्थितीमध्ये स्वाभिमानीच्या शिलेदारांनी सर्वसामान्यांचे ज्वलंत प्रश्न घेऊन मैदानात ऊतरून त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. चळवळ करणे हे इतके सोपे राहिले नाही हे तुम्हाला चार वर्षांत लक्षात आलेले आहेच. पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाव्या लागतील, खोट्या गुन्ह्यात अडकवले जाईल कालपर्यंत बरोबर असणारा माणूस फोडून घेतील आपल्या विरोधात एवढेच ते करू शकतात. आपण थोडेच ईडी, इन्कमटॅक्स, सी.बी.आयला घाबरणारे आहोत? एकमेकांबद्दल गैरसमज पसरविणे, द्वेष निर्माण करणे यामध्ये त्यांची खासियत आहे. अशा या वादळात खवळलेल्या तुफान समुद्रात स्वाभिमानीचा दिवा घेऊन मी आपलं गलबत समुद्रात सोडलेले आहे. दिवा विझू न देता जहाज किनाऱ्यावर न्यायचं आहे. मोठमोठ्या लाटा येत आहेत किनारा येणार आहे कि नाही मला माहित नाही. मी या जहाजाचा कॅप्टन आहे. किनारा गाठण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. याचबरोबर जहाज बुडायला लागले तर ज्यांना लाईफ जॅकेट मिळाले त्यांनी त्याचा अवश्य स्वीकार करावा, असे सांगत दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

तसेच एकत्र काम केल्यानंतर एकमेकांना शिव्याशापही देत बसू नका असे सांगितले. माझे किंवा माझ्या सहकाऱ्यांचे काही निर्णय कदाचित चुकले असतील पण त्यामागे व्यक्तीगत स्वार्थ निश्चितच नव्हता व असणारही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टीRavikant Tupkarरविकांत तुपकरBJPभाजपा