शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 05:29 IST

Raj Thackeray Uddhav Thackeray News: महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याची दोघांनीही दाखवली तयारी, राज विनाअट तर उद्धव ठाकरे यांनी मात्र घातली एक अट

मुंबई : नव्या शिक्षण धोरणात पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा केल्यानंतर उडालेल्या ‘मराठी’च्या धुराळ्याने महाराष्ट्राचे राजकारण तापत असताना आता राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत याबाबत केलेले सुतोवाच आणि त्याला उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद या पार्श्वभूमीवर ही चर्चा यावेळी प्रत्यक्षात साकार होण्याची आशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.

राज ठाकरे यांनी शुक्रवारी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत मनोमिलनाचे संकेत दिले. त्याला शनिवारी उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना राज यांच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर राजकीय क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी मनसेची स्थापना केली त्यानंतर काही वर्षांतच दोन्ही ठाकरे बंधू कधी एकत्र येणार याची चर्चा सुरू झाली. दोन्ही बंधू कुठे इतरत्र एकत्र दिसले की त्यांनी एकत्र यावे अशी चर्चा व्हायची.

राज ठाकरे काय म्हणाले?

महेश मांजरेकरांचा प्रश्न : तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचे स्वप्न आहे.

राज ठाकरे : महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील वाद, आमच्यातील भांडणे, या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणे आणि एकत्र राहणे यात मला फार कठीण गोष्ट वाटत नाही. 

हा फक्त माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. आपण लार्जर पिक्चर बघणे आवश्यक आहे. मी पाहतोच आहे. माझे तर असे म्हणणे आहे की सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा. मी आयत्या पिठावर रेघोट्या मारत नाही.  

उद्धवबरोबर मला काम करायला काहीच हरकत नाही, पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावे? (मांजरेकर - महाराष्ट्राची इच्छा आहे) महाराष्ट्राने जाऊन सांगावे तिकडे, मी असल्या छोट्या-छोट्या गोष्टीत माझा इगो मध्ये आणत नाही.

मी शिवसेनेत होतो तेव्हा बाळासाहेब असतील, उद्धव असेल. उद्धवबरोबर मला काम करायला हरकत नाही.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या या विधानाला प्रतिसाद दिला.

उद्धव ठाकरे : किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा महाराष्ट्र आणि मराठीच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो आहे. पण माझी एक अट आहे.. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल त्याचे आगत स्वागत मी करणार नाही त्यांच्या घरी जाणार नाही, त्याच्या पंगतीला मी बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी माझ्याकडून भांडणे नव्हतीच कोणाशी, मिटवून टाकली चला. 

महाराष्ट्र हिताच्या आड येणाऱ्यांच्या गाठीभेटी घ्यायच्या नाहीत किंवा कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही, छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शपथ घ्यायची आणि मग टाळी देण्याची हाळी द्यायची.हे ठरवा की, कोणासोबत गेल्याने महाराष्ट्राचे, मराठीचे आणि हिंदुत्वाचे हित होणार आहे, माझ्याबरोबर की भाजपबरोबर ?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘नो कमेंट्स’   

शिंदेसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यातील दरेगावात आहेत. त्यांना राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी ते जाऊ द्या, कामाचे बोला, असे म्हणत प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

अटी नव्हे, लोकभावना 

उद्धव ठाकरेंनी घातलेल्या अटी नाहीत. महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांच्याशी संबंध ठेवता कामा नये, त्यांना आपल्या घरात स्थान देता कामा नये, ज्यांनी शिवसेनेच्या पाठित वार केला त्यांना आपल्याकडे स्थान असता कामा नये, ही लोकभावना आहे, असे उद्धव सेनेचे नेते खा. संजय राऊत म्हणाले.

आम्हाला आनंदच 

जर दोघेही एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातले जुने मतभेद, भांडणे विसरून एकत्र येत असतील तर यात वाईट वाटायचे कारण नाही. पण त्यावर आम्ही काय बोलणार? त्यांनी ऑफर दिली, त्यांनी अटी टाकल्या यावर तेच बोलू शकतील. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेmarathiमराठीShiv SenaशिवसेनाMNSमनसे