शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

Raj Thackeray: एकाच घरात राहून केवळ अजित पवारांच्या घरी धाड, सुप्रिया सुळेंच्या नाही; राज ठाकरेंनी विचारला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 22:44 IST

मला ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला बोलतात, मी भूमिका बदलली नाही. मला ट्रॅक बदलायची गरज नाही असं प्रत्युत्तर राज ठाकरेंनी राष्ट्रवादीला दिले.

ठाणे – एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरावर धाड पडते सुप्रिया सुळेंच्या घरात का पडत नाही याचं उत्तर द्यावं. ज्या ज्या वेळेला शरद पवार नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले त्यानंतर नव्या नेत्यावर धाडी पडल्या. संजय राऊतांवर पवार खुश आहेत त्यामुळे पुढचं समजून जा अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी नेत्यांवर घणाघात केला. संपलेला पक्ष इथे येऊन बघा, मनसे विझलेला पक्ष नसून समोरच्याला विझवणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस निवडून येणाऱ्या आमदारांची बांधलेली मोळी आहे. त्याची रस्सी शरद पवारांच्या हाती आहे. ही माणसं दुसऱ्या कुठल्याही पक्षात गेले तरी निवडून येतील असंही राज ठाकरे सांगितले.

गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणावर विरोधकांनी तोंडसुख घेतले. त्यावर उत्तर देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी ठाण्यात उत्तर सभा आयोजित केली आहे. या सभेला मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, माझ्या ताफ्याला कोणीतरी अडवणार आहे. हे गुप्तचर खात्याला कळालं. पण शरद पवारांच्या घरी एसटी कर्मचारी धडक देणार हे गुप्तचर खात्याला कसं कळालं नाही. पोलिसांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेकांनी आपापले तारे तोडले. ते तोडल्यानंतर त्याचे उत्तर द्यायला पाहिजे असं वाटलं. पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायचं नव्हतं. कारण या पक्षांना काही बांधील पत्रकार आहेत ते पण त्याठिकाणी शिरतात आणि मूळ विषयाला भरकटवून टाकतात. वीज नाही म्हणून काही ठिकाणी सभा थांबवली असं कळालं पण मोबाईलवर सर्वकाही दिसतं. ही सभा जम्मूमध्येही मोठे स्क्रीन लावून दाखवली जात आहे. अनेक राज्यात ही सभा दाखवली जात आहे असं त्यांनी सांगितले.

"राज ठाकरे असताना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणाच्या बापात नाही"

तसेच माझ्या सभेनंतर अनेक राजकीय पक्षाशी संबंधित पत्रकारांनी आपापला अजेंडा घेतला. भामट्या पत्रकारांमुळे अनेक चांगले पत्रकार मागे पडले. पत्रकार झाले तर काही संपादकही राजकीय पक्षाला बांधील झालेत. गुढीपाडव्याच्या सभेला अनेक पत्रकारांनी स्वत:चं एक भाषण आणलं होते. दीड वर्षापूर्वीच्या सभेला नरेंद्र मोदींवर बोलले. यावेळेलाही बोलतील. मी नाही बोललो, तेव्हा बोललो परत तशी वेळ आली तर बोलेन. इतरही विषय आहेत. बहुमत शिवसेना-भाजपाकडे आल्यानंतर ज्यारितीने मतदारांची गद्दारी केली. महाविकास आघाडी सरकार बनलं त्याआधी पहाटेचा शपथविधी झाला हेच मी बोललो त्यात भाजपाची स्क्रिप्ट कुठून आली. जे अवघ्या देशाला माहिती आहे तेच मी बोललो त्याची आठवण करून दिली. मला ज्या गोष्टींचा विरोध करायचा होता मी केला. विनाकारण भाषणाला विरोध करायचा असं ते म्हणाले.

वसंत मोरेंनीच 'राज'भेटीतलं सत्य उलगडलं, स्पष्टच सांगितलं

तसेच मला ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला बोलतात, मी भूमिका बदलली नाही. मला ट्रॅक बदलायची गरज नाही. एका वर्षाच्या आत मी कोहिनूरमधून बाहेर पडलो. त्या कंपनीचा तपास सुरू झाला तेव्हा मला नोटीस आली आणि ईडीच्या कार्यालयात गेलो. ईडीच्या नोटिशीची चाहूल लागली तेव्हा शरद पवारांनी केवढं नाटकं केलीत. ज्यांनी पापच केले नाही मग ईडी नोटीस येवो किंवा अन्य काही मी भीक घालत नाही. ज्या गोष्टी मला नाही पटल्या ते जाहीरपणे बोललो. कलम ३७० रद्द केले त्यावर अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होते. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी व्हावेत हे सांगणारा मी पहिला होतो. या देशात समान नागरी कायदा आणा, या देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा अशा २ मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण कराव्यात असं राज ठाकरेंनी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAjit Pawarअजित पवार