शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
2
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
3
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
4
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
5
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
6
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
7
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
8
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
9
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
10
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
11
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
12
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
13
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
14
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
15
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
16
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
17
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
18
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
19
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
20
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: एकाच घरात राहून केवळ अजित पवारांच्या घरी धाड, सुप्रिया सुळेंच्या नाही; राज ठाकरेंनी विचारला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 22:44 IST

मला ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला बोलतात, मी भूमिका बदलली नाही. मला ट्रॅक बदलायची गरज नाही असं प्रत्युत्तर राज ठाकरेंनी राष्ट्रवादीला दिले.

ठाणे – एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरावर धाड पडते सुप्रिया सुळेंच्या घरात का पडत नाही याचं उत्तर द्यावं. ज्या ज्या वेळेला शरद पवार नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले त्यानंतर नव्या नेत्यावर धाडी पडल्या. संजय राऊतांवर पवार खुश आहेत त्यामुळे पुढचं समजून जा अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी नेत्यांवर घणाघात केला. संपलेला पक्ष इथे येऊन बघा, मनसे विझलेला पक्ष नसून समोरच्याला विझवणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस निवडून येणाऱ्या आमदारांची बांधलेली मोळी आहे. त्याची रस्सी शरद पवारांच्या हाती आहे. ही माणसं दुसऱ्या कुठल्याही पक्षात गेले तरी निवडून येतील असंही राज ठाकरे सांगितले.

गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणावर विरोधकांनी तोंडसुख घेतले. त्यावर उत्तर देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी ठाण्यात उत्तर सभा आयोजित केली आहे. या सभेला मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, माझ्या ताफ्याला कोणीतरी अडवणार आहे. हे गुप्तचर खात्याला कळालं. पण शरद पवारांच्या घरी एसटी कर्मचारी धडक देणार हे गुप्तचर खात्याला कसं कळालं नाही. पोलिसांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेकांनी आपापले तारे तोडले. ते तोडल्यानंतर त्याचे उत्तर द्यायला पाहिजे असं वाटलं. पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायचं नव्हतं. कारण या पक्षांना काही बांधील पत्रकार आहेत ते पण त्याठिकाणी शिरतात आणि मूळ विषयाला भरकटवून टाकतात. वीज नाही म्हणून काही ठिकाणी सभा थांबवली असं कळालं पण मोबाईलवर सर्वकाही दिसतं. ही सभा जम्मूमध्येही मोठे स्क्रीन लावून दाखवली जात आहे. अनेक राज्यात ही सभा दाखवली जात आहे असं त्यांनी सांगितले.

"राज ठाकरे असताना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणाच्या बापात नाही"

तसेच माझ्या सभेनंतर अनेक राजकीय पक्षाशी संबंधित पत्रकारांनी आपापला अजेंडा घेतला. भामट्या पत्रकारांमुळे अनेक चांगले पत्रकार मागे पडले. पत्रकार झाले तर काही संपादकही राजकीय पक्षाला बांधील झालेत. गुढीपाडव्याच्या सभेला अनेक पत्रकारांनी स्वत:चं एक भाषण आणलं होते. दीड वर्षापूर्वीच्या सभेला नरेंद्र मोदींवर बोलले. यावेळेलाही बोलतील. मी नाही बोललो, तेव्हा बोललो परत तशी वेळ आली तर बोलेन. इतरही विषय आहेत. बहुमत शिवसेना-भाजपाकडे आल्यानंतर ज्यारितीने मतदारांची गद्दारी केली. महाविकास आघाडी सरकार बनलं त्याआधी पहाटेचा शपथविधी झाला हेच मी बोललो त्यात भाजपाची स्क्रिप्ट कुठून आली. जे अवघ्या देशाला माहिती आहे तेच मी बोललो त्याची आठवण करून दिली. मला ज्या गोष्टींचा विरोध करायचा होता मी केला. विनाकारण भाषणाला विरोध करायचा असं ते म्हणाले.

वसंत मोरेंनीच 'राज'भेटीतलं सत्य उलगडलं, स्पष्टच सांगितलं

तसेच मला ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला बोलतात, मी भूमिका बदलली नाही. मला ट्रॅक बदलायची गरज नाही. एका वर्षाच्या आत मी कोहिनूरमधून बाहेर पडलो. त्या कंपनीचा तपास सुरू झाला तेव्हा मला नोटीस आली आणि ईडीच्या कार्यालयात गेलो. ईडीच्या नोटिशीची चाहूल लागली तेव्हा शरद पवारांनी केवढं नाटकं केलीत. ज्यांनी पापच केले नाही मग ईडी नोटीस येवो किंवा अन्य काही मी भीक घालत नाही. ज्या गोष्टी मला नाही पटल्या ते जाहीरपणे बोललो. कलम ३७० रद्द केले त्यावर अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होते. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी व्हावेत हे सांगणारा मी पहिला होतो. या देशात समान नागरी कायदा आणा, या देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा अशा २ मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण कराव्यात असं राज ठाकरेंनी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAjit Pawarअजित पवार