शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ही तर 'भाऊबंध'की; उद्धव ठाकरेंची भूमिका राज ठाकरेंना आधीच कळते तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 19:09 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिवसेनेवर निशाणा साधला. औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा झाली. यावेळी ते बोलत होते.

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनात काय सुरू आहे, हे मला ठाऊक आहे. शिवसेनेकडून भाजपाला कितीही विरोध केला तरी ते सत्तेतून बाहेर पडणार नाही. स्वत:च्या तुंबडया भरत राहणार, असा आरोप राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केला.औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा झाली. यावेळी ते बोलत होते.

शिवसेना सातत्याने भाजपाला विरोध करत आहे. आम्ही भाजपासोबत यापुढे निवडणूक लढवणार नाही, नाणार प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका शिवसेनेकडून घेण्यात येत आहे. मात्र, लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावावर शुक्रवारी चर्चा आणि मतदान होणार आहे. त्यावेळी शिवसेना काय भूमिका घेते ते आपल्याला पाहायचे आहे. शिवसेनेने कितीही भाजपाला विरोध करत असल्याचे भासवले तरी ते घरंगळत त्यांच्यासोबतच जाणार आहेत, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान,  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चांना उत आला होता. मात्र, अविश्वास प्रस्तावादरम्यान मोदी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून, सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी उपस्थित राहण्याचा व्हीप आपल्या खासदारांना बजावला आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्तावापूर्वीच मोदी सरकारचे पारडे जड झाले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे शिवसेना भाजपालाच साथ देणार हे उघड झाले आणि सगळीकडे राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनातले ओळखल्याची चर्चा सुरु झाली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीNo Confidence motionअविश्वास ठराव