शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

राज्यातही मुसळधार; वीज पडून तिघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 02:45 IST

मुंबईमध्ये शुक्रवारी रात्रभर आणि शनिवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या.

मुंबई : मुंबईसह संपूर्ण राज्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस कोसळल्याने बळीराजा सुखावला. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, विदर्भ, मराठवाडा मुसळधार पाऊस झाला. यवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

मुंबईमध्ये शुक्रवारी रात्रभर आणि शनिवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. ठाणे, पालघर आणि पनवेलसह रायगड जिल्ह्यालाही पावसाने दणका दिला. पावसामुळे वसईत तानसा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही शनिवारी दिवसभर पावसाने झोडपून काढले. रत्नागिरीत शीळ धरण पाण्याने पूर्ण ओसंडून वाहू लागले आहे.

प. महाराष्ट्रात पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ होत आहे. भोगावती नदी काठोकाठ भरून वाहू लागली असून, पंचगंगेची पातळी दोन दिवसांत सात फुटांनी उचलली आहे. सांगली जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना, महाबळेश्वर, नवजा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे.

कोयना धरणात ११ हजार ३०१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पावसामुळे जिल्ह्याच्या महाबळेश्वर, पाटण, कोयनानगर, कास, बामणोली भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील घाटघर येथे दोन दिवसांत ११५ मिलीमीटर पाऊस झाला.मराठवाड्यात गेल्या आठवडाभरापासून पाऊस होत असून औरंगाबाद, लातूर, परभणीत आजही पाऊस पडला.अतिवृष्टीची नोंदगेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विदर्भात काहीठिकाणी मुसळधार तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बºयाच ठिकाणी पाऊस पडला.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र