शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

राज्यातही मुसळधार; वीज पडून तिघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 02:45 IST

मुंबईमध्ये शुक्रवारी रात्रभर आणि शनिवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या.

मुंबई : मुंबईसह संपूर्ण राज्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस कोसळल्याने बळीराजा सुखावला. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, विदर्भ, मराठवाडा मुसळधार पाऊस झाला. यवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

मुंबईमध्ये शुक्रवारी रात्रभर आणि शनिवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. ठाणे, पालघर आणि पनवेलसह रायगड जिल्ह्यालाही पावसाने दणका दिला. पावसामुळे वसईत तानसा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही शनिवारी दिवसभर पावसाने झोडपून काढले. रत्नागिरीत शीळ धरण पाण्याने पूर्ण ओसंडून वाहू लागले आहे.

प. महाराष्ट्रात पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ होत आहे. भोगावती नदी काठोकाठ भरून वाहू लागली असून, पंचगंगेची पातळी दोन दिवसांत सात फुटांनी उचलली आहे. सांगली जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना, महाबळेश्वर, नवजा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे.

कोयना धरणात ११ हजार ३०१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पावसामुळे जिल्ह्याच्या महाबळेश्वर, पाटण, कोयनानगर, कास, बामणोली भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील घाटघर येथे दोन दिवसांत ११५ मिलीमीटर पाऊस झाला.मराठवाड्यात गेल्या आठवडाभरापासून पाऊस होत असून औरंगाबाद, लातूर, परभणीत आजही पाऊस पडला.अतिवृष्टीची नोंदगेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विदर्भात काहीठिकाणी मुसळधार तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बºयाच ठिकाणी पाऊस पडला.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र