शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसात रेल्वे विस्कळीत, मुंबईकरांचे हाल

By admin | Updated: July 2, 2014 14:47 IST

भर पावसात कांजूरमार्ग ते कुर्ला स्थानकांदरम्यान गाड्यांची लांबच लांब रांग लागलेली असतानाच रेल्वे अवघ्या २० मिनिटे उशीराने धावत असल्याची चुकीची माहिती रेल्वेतर्फे देण्यात येत आहे.

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २ -  दमदार पावसाची हजेरी त्यात भर म्हणजे कुर्ल्याला सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने हालात पडलेली भर प्रवाशांसाठी डोकुदुखी झालेली असताना मध्य रेल्वेने अत्यंत दिशाभूल करणारी अनाउन्समेंट करत प्रवाशांना प्रचंड मन:स्ताप दिला. बुधवारी सकाळी मुंबईसह उपनगरामध्ये पावसानं हजेरी लावली. परंतु सकाळी दहाच्या नंतर कुर्ल्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि पार कांजूरमार्गपर्यंत धीम्या गतीच्या मार्गावर गाड्यांची रांग लागली आणि हजारो प्रवासी भर वाटेत खोळंबले. असे असतानाही रेल्वे मात्र गाड्या १५ ते २० मिनिटे उशीरानं धावत असल्याची धादांत खोटी अनाउन्समेंट करत असल्याचे दिसून आले. परिणामी ठाणे डोंबिवलीतल्या हजारो प्रवाशांनी पुढे जाऊन अडकणा-या गाड्यांमध्ये प्रवास करण्याचा निर्णय घेतला. कांजूर ते कुर्ला या दरम्यान जवळपास २० ते २२ लोकल्स एकामागे एक अशा दोन तास उभ्या होत्या आणि महिला, वृद्ध व्यक्ती आणि शाला कॉलेजातली मुलं अशा हजारो लोकांनी शेवटी कंटाळून ट्रॅकमध्ये उतरून जवळचे स्टेशन पायी जाण्याची निर्णय घेतला.
 
कांजूरमार्ग ते कुर्ला दरम्यान गेल्या दोन तासांपासून अनेक लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. मात्र लोकल ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना याविषयी कोणतीही माहिती दिली गेली नाही. लोकलमध्ये पब्लिक अनाउन्समेंट यंत्रणा बसवल्याचा गाजावाजा करण्यात आला मात्र या यंत्रणेच्या माध्यमातूनही प्रवाशांना कुठलीही माहिती देण्यात आली नाही.
दरम्यान, हार्बर मार्गावरही चेंबूर - टिळकनगरदरम्यानही पाणी तुंबल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. वडाळ्याजवळीही सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचे वृत्त आहे.
 
पावसाचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही झाला असून मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. एलबीएस मार्गावर पाणी तुंबल्याने वाहतूक खोळंबली असून, घाटकोपर, सांताक्रूझ येथेही अशीच परिस्थिती असल्याने मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.