शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

शिंदेसाहेब, या  'थ्री इडियट्स'ला आवरा; राष्ट्रवादीची शिवसेना आमदारांवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 15:35 IST

पालकमंत्रिपद न मिळाल्याने होणारे आरोप हे राजकीय हेतूने केलेत. तटकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा हा कट आहे असा आरोप राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केला. 

मुंबई - महायुतीचं सरकार येऊन ४-५ महिने झाले, आता पालकमंत्री नियुक्तीनंतर भरतशेठ आणि इतर आमदारांना सुनील तटकरेंनी आमच्याविरोधात काम केले याची जाणीव झाली. निवडणुकीच्या काळात तटकरे जर विरोधात काम करत होते तर त्याचवेळी आवाज उठवायला पाहिजे होता. जाणीवपुर्वक महायुतीत घटक पक्षाला बदनाम करण्यासाठी आता वेळ निवडली आहे. त्यामुळे माझी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती आहे. या 'थ्री इडियट्स'ला आवरा हे लोक दोस्तीत कुस्ती करायला लागलेत अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष आणि प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केली आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादावर त्यांनी हे भाष्य केले.

एका मुलाखतीत सुरज चव्हाण म्हणाले की, हे तिघे महायुतीत बिघाडी करायले लागलेत. त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या त्यांनी त्यांच्या नेतृत्वाकडे मांडाव्यात. महायुतीत जी समन्वय समिती नेमली त्यांच्याकडे मांडावेत. मात्र जाहीररित्या बोलून महायुतीत बिघाडी करण्याचं काम हे तिघे करतायेत. त्यामुळे या लोकांना वेळीच आवर घाला. जर पाडण्याचं षडयंत्र रचलं होते मग निवडणुकीच्या काळात बोलायला हवे होते. पालकमंत्रिपद न मिळाल्याने होणारे आरोप हे राजकीय हेतूने केलेत. तटकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा हा कट आहे असा आरोप त्यांनी केला. 

तसेच या आमदारांच्या बौद्धिक दिवाळखोरीची किव येते. आमचे ३ आमदार आहेत म्हणून पालकमंत्री मिळावे, कोणाला कुठला जिल्हा हा निकष त्यात लावला. कदाचित जो निकष लावला तो या लोकांना माहिती नसेल किंवा यांची बौद्धिक पातळी बघून शिंदेंनी त्यांना पालकमंत्रिपद दिले नसावे असं मला वाटते. वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही तरीसुद्धा आमच्याकडे पालकमंत्रिपद आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांनी या तिघांचा विचार केला पाहिजे. हे लोक तुमच्या निर्णयाला चॅलेंज करतायेत असा दावाही सुरज चव्हाण यांनी केला.

दरम्यान, चर्चा करूनच पालकमंत्रिपद दिले गेले. अचानक या निर्णयाला स्थगिती दिल्याचे दु:ख होते. वरिष्ठ पातळीवर योग्य तो निर्णय घेतले जाईल. ज्या भूमितून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचा सन्मान कसा करायचा याची भूमिका देशाला दिली आज त्याच भूमीत स्त्रीचा अपमान होत असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. जो काही तिढा निर्माण झाला तो वरिष्ठ नेते एकत्रित बसून सोडवतील असा विश्वास प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :RaigadरायगडEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारsunil tatkareसुनील तटकरेAditi Tatkareअदिती तटकरे