शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसाहेब, या  'थ्री इडियट्स'ला आवरा; राष्ट्रवादीची शिवसेना आमदारांवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 15:35 IST

पालकमंत्रिपद न मिळाल्याने होणारे आरोप हे राजकीय हेतूने केलेत. तटकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा हा कट आहे असा आरोप राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केला. 

मुंबई - महायुतीचं सरकार येऊन ४-५ महिने झाले, आता पालकमंत्री नियुक्तीनंतर भरतशेठ आणि इतर आमदारांना सुनील तटकरेंनी आमच्याविरोधात काम केले याची जाणीव झाली. निवडणुकीच्या काळात तटकरे जर विरोधात काम करत होते तर त्याचवेळी आवाज उठवायला पाहिजे होता. जाणीवपुर्वक महायुतीत घटक पक्षाला बदनाम करण्यासाठी आता वेळ निवडली आहे. त्यामुळे माझी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती आहे. या 'थ्री इडियट्स'ला आवरा हे लोक दोस्तीत कुस्ती करायला लागलेत अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष आणि प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केली आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादावर त्यांनी हे भाष्य केले.

एका मुलाखतीत सुरज चव्हाण म्हणाले की, हे तिघे महायुतीत बिघाडी करायले लागलेत. त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या त्यांनी त्यांच्या नेतृत्वाकडे मांडाव्यात. महायुतीत जी समन्वय समिती नेमली त्यांच्याकडे मांडावेत. मात्र जाहीररित्या बोलून महायुतीत बिघाडी करण्याचं काम हे तिघे करतायेत. त्यामुळे या लोकांना वेळीच आवर घाला. जर पाडण्याचं षडयंत्र रचलं होते मग निवडणुकीच्या काळात बोलायला हवे होते. पालकमंत्रिपद न मिळाल्याने होणारे आरोप हे राजकीय हेतूने केलेत. तटकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा हा कट आहे असा आरोप त्यांनी केला. 

तसेच या आमदारांच्या बौद्धिक दिवाळखोरीची किव येते. आमचे ३ आमदार आहेत म्हणून पालकमंत्री मिळावे, कोणाला कुठला जिल्हा हा निकष त्यात लावला. कदाचित जो निकष लावला तो या लोकांना माहिती नसेल किंवा यांची बौद्धिक पातळी बघून शिंदेंनी त्यांना पालकमंत्रिपद दिले नसावे असं मला वाटते. वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही तरीसुद्धा आमच्याकडे पालकमंत्रिपद आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांनी या तिघांचा विचार केला पाहिजे. हे लोक तुमच्या निर्णयाला चॅलेंज करतायेत असा दावाही सुरज चव्हाण यांनी केला.

दरम्यान, चर्चा करूनच पालकमंत्रिपद दिले गेले. अचानक या निर्णयाला स्थगिती दिल्याचे दु:ख होते. वरिष्ठ पातळीवर योग्य तो निर्णय घेतले जाईल. ज्या भूमितून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचा सन्मान कसा करायचा याची भूमिका देशाला दिली आज त्याच भूमीत स्त्रीचा अपमान होत असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. जो काही तिढा निर्माण झाला तो वरिष्ठ नेते एकत्रित बसून सोडवतील असा विश्वास प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :RaigadरायगडEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारsunil tatkareसुनील तटकरेAditi Tatkareअदिती तटकरे