शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

राहुल नार्वेकरांचे बहुमताला न्याय देण्याचे संकेत अन् असीम सरोदेंचे दोन प्रश्न...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 9:31 AM

राजकीय फटाके नेहमीच फुटत असतात. फटाके फुटायला अजून वेळ आहे. लोकशाहीत अनेकांचे निर्णय बहुमतावर असतात, असे राहुल नार्वेकर म्हणाले होते.

शिवसेनेतील बंडाळी आणि त्यानंतरचा आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न दीड वर्ष होत आले तरी सुटलेला नाहीय. यामुळे ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला होता. तिथे सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत निकाल देण्याचे आदेश दिले आहेत. तरीही विधानसभा अध्यक्ष अजून वेळ असल्याचे म्हणत आहेत. कालच दिवाळीच्या दिवशी त्यांनी निकाल काय लागेल याचे संकेत दिलेले आहे. यावर प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी त्यांना सवाल केले आहेत. 

राजकीय फटाके नेहमीच फुटत असतात. फटाके फुटायला अजून वेळ आहे. लोकशाहीत जनसामान्याला संविधानिक निर्णय होण अपेक्षित असते. तसाच निर्णय घेणे गरजेचे आहे आणि सरकार तसा निर्णय घेईल. लोकशाहीत अनेकांचे निर्णय बहुमतावर असतात. राजकीय दृष्ट्या जनतेला न्याय मिळेल असा निर्णय घेणे गरजेचे आहे. संविधानात ज्या तरतुदी आहेत, त्याच पालन करून कायद्यानुसार निर्णय आपण घेऊ, असे नार्वेकर म्हणाले होते. 

यावर सरोदे यांनी दोन प्रश्न उपस्थित केले आहेत. बहुमत असेल तेच बरोबर असतात का? अल्पमतात असतात ते देखील बरोबर असू शकतात, लोकशाही बहुमताच्या आधारावर चालत असते हे मान्य परंतू मग कमी मते असलेल्यांवर अन्याय करणार का असा सवाल त्यांनी केला आहे. राहुल नार्वेकरांना कोर्टाने मोठी जबाबदारी दिली आहे ती त्यांना कायद्याच्या चौकटीतच राहून पार पाडावी लागणार आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर कायदेशीर बाबच महत्त्वाची ठरेल, असे ते म्हणाले. 

लोकांच्या अपेक्षेनुसार म्हणजे नक्की कुणाच्या अपेक्षेनुसार ? ते लोक कोण आहेत? असा सवाल सरोदे यांनी केला आहे. लोकशाहीत अल्पसंख्याक बरोबर असतील तर त्यांचं मत ग्राह्य धरलं जाणार की नाही? राहुल नार्वेकर हे कायद्याच्या चौकटीत आणि संविधानाचा आदर करणारा निर्णय देतील अशी अपेक्षा आपण करू, असे सरोदे म्हणाले. 

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरAsim Sarodeअसिम सराेदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षEknath Shindeएकनाथ शिंदे