शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Corona Vaccination: “केंद्राने दुजाभाव केला असता, तर लसीकरणात राज्य आघाडीवर असते का”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 18:54 IST

Corona Vaccination: केंद्र सरकारने दुजाभाव केला असता, तर राज्य लसीकरणात आघाडीवर असते का, अशी विचारणा भाजपकडून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देभाजपचा ठाकरे सरकारवर निशाणामुख्यमंत्र्यांच्या घोषणांची पूर्तता झाली का? - विखे-पाटीलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला - विखे-पाटील

नगर: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनावरील नियंत्रणासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, देशातील लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. मात्र, कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील पात्र व्यक्तींचे लसीकरण शक्य नसल्याचे म्हटले आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात असताना, केंद्र सरकारने दुजाभाव केला असता, तर राज्य लसीकरणात आघाडीवर असते का, अशी विचारणा भाजपकडून करण्यात आली आहे. (radhakrishna vikhe patil criticised maha vikas aghadi govt over corona vaccination in the state)

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. लस पुरवठ्यात केंद्र सरकार दुजाभाव करीत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत, तर दुसरीकडे राज्य लसीकरणात आघाडीवर असल्याचे सांगून पाठ थोपटून घेत आहेत. जर केंद्राने दुजाभाव केला असता तर महाराष्ट्राला एवढी लस मिळाली असती का? केंद्राच्या सहकार्याशिवाय लसीकरणात राज्याला प्रगती करता आली असती का? अशी विचारणा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. 

आमची प्रतिमा डागाळली; निवडणूक आयोगाची मद्रास हायकोर्टात याचिका

मुख्यमंत्र्यांच्या घोषणांची पूर्तता झाली का?

राज्य सरकारने दुसऱ्या लॉकडाउनची घोषणा केली, मात्र पहिल्या लॉकडाउनच्या काळात मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना मदतीच्या ज्या घोषणा केल्या होत्या, त्याची पूर्तता झाली का, असा सवाल करत मुख्यमंत्र्याच्या मगील घोषणेनंतरही गरजूना धान्य मिळालेले नाही. सामान्य माणसाची उपासमार सुरूच आहे. आता किमान दुसऱ्यांदा झालेल्या घोषणांची तरी अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

केंद्र, राज्यांसाठी लसींच्या किमती वेगळ्या का? सुप्रीम कोर्टाची सरकारला विचारणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला

देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला. असे असूनही केंद्र सरकार लसीकरणात दुजाभाव करते हा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा आरोप आश्चर्यकारक वाटतो, असा टोला विखे पाटील यांनी लगावला आहे.

“आतातरी काहीतरी करा”; १०० प्रसिद्ध शास्त्रज्ञांचे पंतप्रधान मोदींना पत्र

दरम्यान, महसूल मंत्र्यांनी लिहिलेले हे पत्र म्हणजे स्वत:ची अब्रू झाकण्याचा प्रकार आहे. एक वर्षापासून करोनाचे संकट आहे. महसूल मंत्र्याना सुविधांचा अभाव असल्याचे आता कळाले काॽ फक्त फार्स करायचा आणि स्वतःचे अपयश झाकण्यासाठीचा हा पत्रव्यवहार आहे, असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातBJPभाजपाRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलPoliticsराजकारण