शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

वैचारिक मतभेद बाजूला ठेवू; आता आपल्या बळीराजासाठी एकत्र येऊ: प्रकाश आंबेडकरांना शेट्टींची साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 18:27 IST

वैचारिक मतभेद असतील ते बाजूला सारून त्यांनी मुंबईच्या मोर्चात सहभागी व्हावे...

पुणे : केंद्राने मंजूर केलेले कृषी विधेयक रद्द व्हावेत, यासाठी सर्व शेतकरी संघटना एकत्रित लढत आहेत. त्याचवेळी भाजपाच्या शेतकरी संघटना देखील त्यांच्या कृषी कायद्याच्या बाजूने बोलताना दिसत नाही. तरीही पंतप्रधान मोदी का अडून बसले आहेत. परंतू जोपर्यंत सरकार मागे हटणार नाही तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाहीत. तसेच ज्या अंबानी आणि अदानी यांच्यासारख्या बड्या उद्योजकांसाठी हे विधेयके मंजूर करण्यात आली आहे. त्याच्या निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व शेतकरी बांधवाना सोबत घेऊन २२ डिसेंबरला मुंबईत उपजिल्हाधिकारी कार्यालय ते अंबानी इस्टेटवर धडक मोर्चा काढणार आहेत. या धडक मोर्चात प्रकाश आंबेडकर तुम्ही देखील सहभागी व्हावे अशी साद माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. 

पुण्यात बुधवारी (दि. १६) झालेल्या पत्रकार परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. यावेळी ज्येष्ठ  कामगार नेते डॉ. बाबा आढावा, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, प्रतिभा शिंदे, राजू पोकळे, अमोल हिप्परगे आदी उपस्थित होते. 

राजू शेट्टी म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी देखील शेतकर्‍यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. तसेच ते सुद्धा शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणार आहेत. मात्र, आमच्यात जे काही वैचारिक मतभेद असतील ते बाजूला सारून त्यांनी मुंबईच्या मोर्चात सहभागी व्हावे, आम्ही त्यांचे स्वागतच करू. कारण बळीराजासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.  

केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना शेट्टी म्हणाले, गेल्या २० दिवसांपासून शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. कोरोना काळात शेती व्यवसाय कंपन्यांना समजला आहे. त्यामुळेच अदानी, अंबानी यांना हा व्यवसाय देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. 

ज्या अंबानी आणि अदानी यांच्यासाठी केंद्र सरकारने हे कृषी विधेयक आणले आहे. त्यांच्यातील अंबानी यांची तर जगातल्या पहिल्या पाच श्रीमंतांच्या यादीत नाव घेतलॆ जाते. आम्हाला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, बाबा नेमकी तुझी भूक भागणार तरी कधी आहे ? हा प्रश्न आम्ही सर्वजण मुंबईतील मोर्चात मुकेश अंबानी यांना विचारणार आहोत. 

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीagitationआंदोलनCentral Governmentकेंद्र सरकार