शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

अभिमानास्पद! यूएनच्या रिपोर्टमध्ये का घेतलं बीडच्या छोट्या गावातील ‘या’ तरुणीचं नाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 13:02 IST

सोनीने तिचा अनुभव सांगितला की, मी जेव्हा १५ वर्षाची होती त्यावेळी माझ्या काकांनी २८ वर्षाच्या युवकाशी माझं लग्न ठरवलं होतं. मी तेव्हा लहान होते, कोणतीही जबाबदारी उचलू शकत नव्हते

ठळक मुद्देसोनीने हा सगळा अनुभव २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय बाल दिनी कार्यक्रमात सगळ्यांच्या समोर ठेवलामागासवर्गीय महिला विकास मंडळ संस्थेच्या मदतीनं कौशल्य विकासतंर्गत नर्सचं प्रशिक्षण घेतलंसमाजातील भेदभाव, मुलींवरील अन्याय यासाठी जागरुकता निर्माण करण्याचे काम करते

मुंबई – संयुक्त राष्ट्र संघाकडून अलीकडेच जागतिक लोकसंख्या स्थिती रिपोर्ट २०२० जारी करण्यात आला. यात जगभरातील बालविवाहाचं प्रमाण २१ टक्के असण्यावर चिंता व्यक्त करण्यात आली. जगातील प्रत्येक ५ मुलींपैकी एका मुलीचं वयाच्या १८ वर्ष पूर्ण होण्याआधीच लग्न केले जाते. हा रिपोर्ट भारतासाठी महत्त्वाचा आहे, देशात प्रत्येक ४ मुलींपैकी एका मुलीचं १८ वर्षाआधी लग्न होतं असं सांगण्यात आलं आहे.

भारतातील राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१५-१६ च्या आकडेवारीवर रिपोर्ट आहे. यात त्या भारतीय महिलांचे कौतुक करण्यात आले आहे. ज्यांनी बालविवाहसारख्या प्रथेविरोधात हिंमतीने आवाज उठवला, शिक्षणाच्या जोरावर या महिलांनी आत्मनिर्भर होऊन आपल्या जीवनाचा मार्ग शोधला आहे. या रिपोर्टमध्ये राज्यातील बीड जिल्ह्यात राहणाऱ्या सोनी या मुलीचा उल्लेख करण्यात आला. सोनीचे आई-वडील कामासाठी गावाबाहेर असतात.

सोनीने तिचा अनुभव सांगितला की, मी जेव्हा १५ वर्षाची होती त्यावेळी माझ्या काकांनी २८ वर्षाच्या युवकाशी माझं लग्न ठरवलं होतं. मी तेव्हा लहान होते, कोणतीही जबाबदारी उचलू शकत नव्हते. दुष्काळामुळे अनेक ठिकाणी मजुरांना दुसऱ्या जिल्ह्यात रोजंदारीसाठी पलायन करावं लागतं. त्यात फक्त पती-पत्नी अशा दोघांनाच कामावर ठेवलं जातं. त्यामुळे अनेकदा मजुरांच्या कुटुंबातील मुलांना त्रास सहन करावा लागतो. त्यात मुलींना सर्वाधिक त्रास होतो, त्यामुळे मुलीचं लवकर लग्न करुन तिला अधिक सुरक्षित करण्यासाठी नातेवाईक प्रयत्न करतात.

मात्र सोनीची गोष्ट वेगळी आहे, शारीरीक आणि आर्थिक सुरक्षेसाठी तिचं लग्न लावण्यात आलं. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच सोनीला तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या मंडळींनी मारहाण सुरु केली. मी बिनधास्त मनातलं सगळं काही बोलायची म्हणून मी वाईट आहे असं त्यांना वाटत असे. त्यांनी अनेकदा मला तांत्रिकाकडे नेले, भूत पळवण्याच्या नावाखाली मारहाण केली. अशातच सोनीच्या घरच्यांनीही तिला साथ दिली नाही. सोनीने हा सगळा अनुभव २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय बाल दिनी कार्यक्रमात सगळ्यांच्या समोर ठेवला.

यानंतर सोनीने मागासवर्गीय महिला विकास मंडळ संस्थेच्या मदतीनं कौशल्य विकासतंर्गत नर्सचं प्रशिक्षण घेतलं. तसेच गावातील १२ मुलींनाही तिने या उपक्रमाशी जोडलं. सध्या सोनी पूर्णपणे आत्मनिर्भर असून पुण्यातील एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करते, त्याचसोबत ती समाजातील भेदभाव, मुलींवरील अन्याय यासाठी जागरुकता निर्माण करण्याचे काम करते. त्याचसोबत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते आणि कमाईच्या बळावर स्वत:चं भवितव्य सुरक्षित केले आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा मुख्यमंत्री अशोक गहलोत करणार ‘The END’?

रायगडावरील हत्ती तलाव १५० वर्षांनी भरला; छत्रपती संभाजीराजेंनी जलपूजन केलं अन् म्हणाले...

विश्व हिंदू सेनेचं आंदोलन की स्टटंबाजी?; नेपाळी सांगून ज्या युवकाचं मुंडन केलं, तो तर...

नववधू कोरोना पॉझिटिव्ह निघाली; कुटुंबातील ९ जण बाधित तर ८६ जणांना क्वारंटाईन केलं

वैद्यकीय चमत्कार! १३० दिवसांनी महिलेला मिळालं जीवदान; नर्स अन् डॉक्टरांचे मानले आभार

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघchildren's dayबालदिन