शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दुष्काळामुळे राज्यात ऊसाचे उत्पादन घटणार :  प्राथमिक अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 13:55 IST

राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे अगामी ऊस गाळप हंगामासाठी तब्बल पावणे चारशे लाख टन ऊस गाळपासाठी कमी उपलब्ध होईल.

ठळक मुद्देसाखरेच्या उत्पादनात होणार ४२ लाख टनांनी घट गेले दोन हंगाम राज्यात विक्रमी साखर उत्पादन साखर उत्पादनात ६५ लाख टनापर्यंत होऊ शकते घट कारखान्यांनी विजेतून मिळवले १ हजार कोटी 

पुणे : राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे आगामी ऊस गाळप हंगामासाठी तब्बल पावणे चारशे लाख टन ऊस गाळपासाठी कमी उपलब्ध होईल. त्यामुळे साखर उत्पादनात ६५ लाख टनापर्यंत घट होऊ शकते. म्हणजेच नुकत्याच संपलेल्या हंगामापेक्षासाखरेच्या उत्पादनात ४२ लाख टनांची घट होईल, असा प्राथमिक अंदाज आहे.साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आगामी ऊस हंगामाचा अंदाज आणि नुकत्याच संपलेल्या हंगामाची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. गेले दोन हंगाम राज्यात विक्रमी साखर उत्पादन होत आहे. राज्यात २०१७-१८ या हंगामात ९५२.६० लाख टन ऊस गाळपातून विक्रमी १०७.१० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ९५२.११ लाख टन ऊस गाळपातून १०७.२० लाख टन साखर उत्पादित करुन गेल्या वेळचा विक्रम मोडला गेला. गेल्यावर्षी शेवटच्या टप्प्यात फारसा पाऊस झाला नाही. तसेच, परतीच्या पावसाने पाठ फिरविली असून, वळवाचा पाऊस देखील झाला नाही. त्यामुळे चाºयासाठी मोठ्या प्रमाणावर ऊस जात आहे. अजूनही राज्यात मॉन्सून सक्रीय झालेला नसल्याने चाºयासाठी आणखी ऊस तोडला जाऊ शकतो. दुष्काळी स्थितीमुळे राज्यात २०१९-२० या हंगामासाठी ५७० लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. राज्याचा सरासरी साखर उतारा साडेअकरा टक्का आहे. त्यामुळे यंदा ६४.४१ लाख टन साखर उत्पादनाचा प्राथमिक अंदाज आहे. यानंतर पडणारा पाऊस, चाऱ्यासाठी झालेली तोड याचा विचार करुन पुढील अंदाज जुलै-ऑगस्टमधे वर्तविण्यात येईल. -----------------

कारखान्यांनी विजेतून मिळवले १ हजार कोटी राज्यात ५९ सहकारी आणि ५२ खासगी कारखान्यांमधे सहविज प्रकल्प आहेत. यातून कारखान्यांनी गेल्या हंगामात २२१.१३ कोटी युनिट्स विज निर्मिती केली. त्यातील ४७.९६ कोटी युनिट विज स्वत:साठी वापरली असून, १४६.१७ कोटी युनिट्स विज निर्यात केली. त्यातून १ हजार ४१ कोटी १० लाख रुपयांचे उत्पन्न कारखान्यांना मिळाले.  --------------------कारखान्यांचे साडेचारशे कोटी महावितरणकडे थकीतराज्यातील साखर कारखान्यांनी पुरवठा केलेल्या विजेचे तब्बल साडेचारशे कोटी रुपये राज्य विद्युत वितरण कंपनीकडे (एमएसइडीसीएल) थकीत असल्याची माहिती साखर आयुक्तांनी दिली. --------------

राज्यातील उत्कृष्ट कारखाने 

कारखान्याचे नाव             पहिला                दुसरा            तिसरा    ऊस गाळप            जवाहर सहकारी-कोल्हापूर        विठ्ठलराव शिंदे-सोलापूर        अंबालिका-अहमदनगर(लाख टन)            (१७.६३ )            (१७.४४)            (१३.६४)साखर उत्पादन            जवाहर (२२.४७)            विठ्ठलराव शिंदे (१९.२६)        सह्याद्री-सातारा (१६.३१)साखर उतारा (टक्का)        गुरुदत्त-कोल्हापूर (१३.४१)        दालमिया-कोल्हापूर (१३.२१)     जयवंत-सातारा (१३)       सर्वाधिक गाळप दिवस        विघ्नहर-पुणे (१९५)        सह्याद्री-सातारा (१७५)        सोमेश्वर-पुणे (१७१)

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती