शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पृथ्वीराज चव्हाणांमुळेच काँग्रेसला फटका - नारायण राणे 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 7:30 PM

राज्यामध्ये सत्तेत असताना काँग्रेसने काहीच केलं नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भरीव असे काम न केल्यानेच काँग्रेसला त्याचा फटका बसला. त्यामुळे त्यांची सत्ता गेली. आता काँग्रेसमध्ये राहिले  काय ज्याने परत सत्ता येईल.

सिंधुदुर्गनगरी : राज्यामध्ये सत्तेत असताना काँग्रेसने काहीच केलं नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भरीव असे काम न केल्यानेच काँग्रेसला त्याचा फटका बसला. त्यामुळे त्यांची सत्ता गेली. आता काँग्रेसमध्ये राहिले  काय ज्याने परत सत्ता येईल. त्यामुळे जनता पुन्हा काँग्रेसला सत्ता देईल या भ्रमात  त्यांनी राहू नये असा सल्ला खासदार नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला दिला.  काँग्रेसने सध्या सत्ता बदलून घेण्यासाठी जन संघर्ष यात्रा सुरू केली आहे, या पार्श्वभूमिवर ते पत्रकारांशी बोलत होते. पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार नीतेश राणे, डॉ. मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.कोल्हापूर येथून शुक्रवारपासून काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू झाली. या पार्श्वभूमिवर बोलताना राणे म्हणाले, काँग्रेस सत्तेत असताना काही करू शकली नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना चांगले काम केले असते. तर जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिले असते. आता जनसंघर्ष यात्रा काढून त्याचा काही फायदा काँग्रेसला होईल, असे आपल्याला वाटत नाही.मुंबई-गोवा महामार्गाच्या झालेल्या स्थितीबाबत राणे यांना विचारले असता ते म्हणाले, हा महामार्ग गणपतीच्या अगोदर व्यवस्थित व्हायला पाहिजे त्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना लेखी पत्र दिले आहे. महामार्गाची दुरावस्था होणे याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित ठेकेदाराची आहे. ठेकेदाराने लक्ष न दिल्याने ही स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे असा ठेकेदार असू नये असे आपले मत आहे. आज जिल्ह्यात मंत्री चंद्रकांत पाटील येत आहेत त्यांची कणकवली येथे आपण भेट घेणार आहोत. त्यावेळीही या स्थितीबाबत आपलं मत मांडणार असेही राणे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.   १२ सप्टेंबर रोजी चिपी विमानतळावर विमानाची चाचणी होणार आहे. त्याठिकाणी आवश्यक त्या प्राथमिक सुविधा तयार करणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी आहे. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी आपल्याला १२ सप्टेंबर रोजी तिथे उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे मी त्यादिवशी तिथे उपस्थित राहणार असेही राणे यांनी यावेळी स्पस्ट केले.  

मराठा आरक्षणाबाबत आचारसंहिते अगोदर प्रतिज्ञापत्र सादर करावे       मराठा आरक्षणाबाबत पत्रकारांनी विचारले असता नारायण राणे म्हणाले मराठा आरक्षण हा विषय पुढे पुढे ढकलून चालणार नाही. खरे म्हणजे महाराष्ट्र शासनाने न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करून हा विषय मार्गी लावणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी  डिसेंबर  जानेवारी असे करत राहण्याची आवश्यकता नाही. आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्याची क्षमता या सरकारमध्ये आहे. त्यामुळे आचार संहितेच्या अगोदर हे प्रतिज्ञापत्र शासनाने न्यायालयात हजर करावे, अन्यथा निवडणुकांमध्ये त्याची मोठी किंमत मोजावी लागेल असेही ते म्हणाले.सी वर्ल्ड प्रकल्प आम्ही गुंडाळू देणार नाहीसी वर्ल्ड प्रकल्प गुंडाळला जाणार याबाबत चर्चा आहे याबाबत पत्रकारांनी विचारले असता हा प्रकल्प आपण कसाच गुंडाळू देणार नाही. तसे मला मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले आहे. लवकरच संयुक्त बैठक होईल आणि त्यात पुढील दिशा ठरेल असेही राणे यांनी यावेळी स्पस्ट केले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMaratha Reservationमराठा आरक्षणcongressकाँग्रेस