शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

संडे स्पेशल मुलाखत : '' जम्मू '' तील तरुणाईला व्यवसायभिमुख बनविण्यास देणार प्राधान्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 9:31 PM

’आजवर जम्मू  काश्मीर म्हटल्यास आपल्याला तेथील अराजकता दिसून येते. मात्र त्या अराजकतेचा तेथील नागरिकांवर काय परिणाम होतो याची आपणास कल्पना नसते...

’आजवर जम्मू  काश्मीर म्हटल्यास आपल्याला तेथील अराजकता दिसून येते. मात्र त्या अराजकतेचा तेथील नागरिकांवर काय परिणाम होतो याची आपणास कल्पना नसते. सध्या जम्मूच्या खो-यातील असंख्य तरुण रोजगाराकरिता भारताच्या कानाकोप-यात जात आहे. जम्मुत जे पिकते ते जगासमोर आणण्याचा प्रयत्न नजीकच्या काळात आयएमएमच्या माध्यमातून केला जाणार आहे. यातून तेथील तरुणाईला व्यवसायभिमुख बनविण्याकडे विशेष भर देण्यात येणार आहे. असे मत जम्मूच्या बोर्ड ऑफ गव्हर्नस ऑफ इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मँनेजमेंटपदाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले.’ 

1.जम्मूतील आपल्या कार्यक्षेत्राविषयी काय सांगाल?- आयआयएमच्या वतीने आता जम्मुतील वेगवेगळ्या भागांमध्ये नजीकच्या काळात सर्वेक्षण केले जाईल. त्यानुसार कुठल्या भागात नेमक्या कशास्वरुपाचे व्यवसाय उभारणीवर भर द्यावा लागेल याची कल्पना येईल. त्यानुसार सुरुवातीला पायाभुत सोयीसुविधा उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. 200 एकरच्या जागेत आता कंपाऊडचे काम सध्या सुरु असून पुढील चार वर्षांच्या कालावधीत नवनवीन योजना प्रत्यक्षात आणण्यावर लक्ष केंद्रीत केले जाईल. याच बरोबर शैक्षणिकदृष्ट्या युवकांमध्ये जागरुकता निर्माण करता येईल. व्यवस्थापन प्रशासनाव्दारे तरुणांना उद्योगजकतेचे शिक्षण घेण्याकरिता प्रोत्साहित करणे मुख्य उद्देश आहे. 

2. आपल्यापुढे कुठली आव्हाने असतील ?- काश्मिरच्या तुलनेत जम्मुतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तुलनेने तितकासा आव्हानात्मक नाही. सध्या कश्मिरमध्ये जी परिस्थिती आहे ती जम्मुत जाणवत नाही. अर्थात यासगळ्यांचे आव्हान आहेच. जम्मुतील तरुणाईला आयआयएमपर्यंत घेऊन येण्याकरिता पुरेसे प्रयत्न करावे लागतील. त्यांच्याकरिता ही मोठी संधी आहे. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त आयआयएमशी स्वत:ला जोडून घेणे महत्वाचे ठरणार आहे. भविष्यात या ठिकाणी आणखी नवीन कोर्सेस सुरु करायचे असून ते शेतीसंबंधी असणार आहेत. त्यात खासकरुन सफरचंदाच्या ब्रँण्डिंगवर भर दिला जाणार आहे. 

* जम्मुतील सफरचंद संपूर्ण भारतात प्रसिध्द आहेत. विविध देशांमध्ये त्याची निर्यात देखील होते. मात्र जम्मुतील तरुणाईला त्या व्यवसायातून जगभर पोहचविण्याकरिता संस्था प्रयत्न करणार आहे. बाजारपेठेचे सतत बदलत जाणारे स्वरुप बघता सफ रचंदाच्या व्यवसायाला अत्याधुनिक तंत्रज्ञान व मार्केटींगची जोड दिल्यास त्याचा फायदा तरुण व्यावसायिकांना होईल. असे वाटत असल्याची भावना कांबळे व्यक्त करतात. याचबरोबर तेथील कारागिरीला व्यवसायात परिवर्तीत करण्याकरिता आता नवीन पिढीला व्यवस्थापन व उदयोगधंद्याचा दृष्टीकोन समजून सांगावा लागेल. असेही ते म्हणाले. ............देशात महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात आघाडीवर आहे. असे म्हटल्यास ती अतिशोयक्ती ठरु नये. दुसरं म्हणजे राज्यातील उदयोगक्षेत्रात बहुजन समाजातील व्यक्तींचा प्रत्यक्ष सहभाग सर्वाधिक आहे. आपण लघु आणि मोठे उद्योगांना कच्च्या स्वरुपात भांडवल पुरविणा-यांचा अभ्यास केल्यास आपल्याला वस्तुस्थिती कळेल. मार्केटींग, सर्विस आणि टेÑड या तिन्ही क्षेत्रात भविष्यात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे. त्याचा फायदा या वर्गाला होईल. याकरिता प्रयत्न सुरु आहेत.  - मिलिंद कांबळे 

टॅग्स :PuneपुणेJammu Kashmirजम्मू-काश्मीर