शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
2
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
3
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
4
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
5
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
6
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
7
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
8
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
9
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
10
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
11
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
12
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
13
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
14
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
15
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
16
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
17
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
18
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
19
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
20
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'

प्रकाश आंबेडकर तुम्ही कोणाला साथ देत आहात? सुशीलकुमार शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 12:50 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनभर धर्मांध शक्तीला विरोध केला व त्यांचा वारसा सांगत असलेले प्रकाश आंबेडकर त्याच शक्तींना मदत होईल, असे राजकारण करत आहेत.

ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीका

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनभर धर्मांध शक्तीला विरोध केला व त्यांचा वारसा सांगत असलेले प्रकाश आंबेडकर त्याच शक्तींना मदत होईल, असे राजकारण करत आहेत. तुम्ही कोणाबरोबर आहात याचा विचार करणार आहात की नाही, असा प्रश्न माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही त्यांनी टीका केली.रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना शिंदे यांच्या हस्ते आंबेडकर-नेहरू मैत्री पुरस्कार देण्यात आला. माजी खासदार, अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, काँग्रेस नेते उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, अभय छाजेड, अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, कार्यक्रमाचे संयोजक राहुल डंबाळे यावेळी उपस्थित होते. मोदी यांना हुकूमशहा व्हायचे आहे, अशी टीका करून शिंदे म्हणाले, ‘‘३७० कलम हटवून कोणी सरदार पटेल होणार नाही. काश्मिरमधील स्थिती दोन महिने होऊन गेले तरीही तणावपूर्ण आहे. सर्वोच्च न्यायालयाला त्याची दखल घ्यावी लागली. नेहरू यांना पंतप्रधान करा, असे खुद्द पटेल यांनीच सांगितले होते. त्याचे दाखले आहेत. मात्र, ते दडवून नवाच खोटा इतिहास सांगितला जात आहे, असे करून नेहरूंची देशावरची छाप पुसता येणार नाही हे सत्ताधाºयांनी लक्षात घ्यावे.’’  देशातील धर्मांध शक्तींच्या विरोधात लढण्याची गरज असून त्यासाठी दलित चळवळीतील सर्वांनी मतभेद मिटवून एकत्र आले पाहिजे, असे शिंदे म्हणाले. तात्पुरत्या लाभापोटी विचारांना माती देत समाजातीलच काहीजण धर्मांध शक्तींबरोबर जुळवून घेत आहेत, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली.आंबेडकरी चळवळ आणि पुरोगामी विचारांची ऊर्जा या पुरस्काराने दिली असून, जातीयवादी आणि धर्मांध शक्तींचा बिमोड करण्याचे बळ मिळाले आहे, अशी भावना बागवे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. मोर्चाच्या अध्यक्षा सुवर्णा डंबाळे यांनी प्रास्ताविक केले. ............प्रा. कवाडे यांनी देशाच्या धर्मनिरपेक्षतेला आरएसएस-भाजपरूपी ग्रहण लागले आहे, अशी थेट टीका केली. आरक्षणामुळेच समाजातील वंचित घटकांना प्रगतीची संधी मिळते. त्यामुळे ते रद्द करायचे असेल तर आधी त्याची समीक्षा करा असे ते म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपा