शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

प्रकाश आंबेडकर तुम्ही कोणाला साथ देत आहात? सुशीलकुमार शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 12:51 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनभर धर्मांध शक्तीला विरोध केला व त्यांचा वारसा सांगत असलेले प्रकाश आंबेडकर त्याच शक्तींना मदत होईल, असे राजकारण करत आहेत.

ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीका

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनभर धर्मांध शक्तीला विरोध केला व त्यांचा वारसा सांगत असलेले प्रकाश आंबेडकर त्याच शक्तींना मदत होईल, असे राजकारण करत आहेत. तुम्ही कोणाबरोबर आहात याचा विचार करणार आहात की नाही, असा प्रश्न माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही त्यांनी टीका केली.रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना शिंदे यांच्या हस्ते आंबेडकर-नेहरू मैत्री पुरस्कार देण्यात आला. माजी खासदार, अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, काँग्रेस नेते उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, अभय छाजेड, अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, कार्यक्रमाचे संयोजक राहुल डंबाळे यावेळी उपस्थित होते. मोदी यांना हुकूमशहा व्हायचे आहे, अशी टीका करून शिंदे म्हणाले, ‘‘३७० कलम हटवून कोणी सरदार पटेल होणार नाही. काश्मिरमधील स्थिती दोन महिने होऊन गेले तरीही तणावपूर्ण आहे. सर्वोच्च न्यायालयाला त्याची दखल घ्यावी लागली. नेहरू यांना पंतप्रधान करा, असे खुद्द पटेल यांनीच सांगितले होते. त्याचे दाखले आहेत. मात्र, ते दडवून नवाच खोटा इतिहास सांगितला जात आहे, असे करून नेहरूंची देशावरची छाप पुसता येणार नाही हे सत्ताधाºयांनी लक्षात घ्यावे.’’  देशातील धर्मांध शक्तींच्या विरोधात लढण्याची गरज असून त्यासाठी दलित चळवळीतील सर्वांनी मतभेद मिटवून एकत्र आले पाहिजे, असे शिंदे म्हणाले. तात्पुरत्या लाभापोटी विचारांना माती देत समाजातीलच काहीजण धर्मांध शक्तींबरोबर जुळवून घेत आहेत, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली.आंबेडकरी चळवळ आणि पुरोगामी विचारांची ऊर्जा या पुरस्काराने दिली असून, जातीयवादी आणि धर्मांध शक्तींचा बिमोड करण्याचे बळ मिळाले आहे, अशी भावना बागवे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. मोर्चाच्या अध्यक्षा सुवर्णा डंबाळे यांनी प्रास्ताविक केले. ............प्रा. कवाडे यांनी देशाच्या धर्मनिरपेक्षतेला आरएसएस-भाजपरूपी ग्रहण लागले आहे, अशी थेट टीका केली. आरक्षणामुळेच समाजातील वंचित घटकांना प्रगतीची संधी मिळते. त्यामुळे ते रद्द करायचे असेल तर आधी त्याची समीक्षा करा असे ते म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपा