शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

...तर इगतपुरीत जाऊन विपश्यना करा; आंबेडकरांचा फडणवीस, पाटलांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 14:57 IST

राजकीय टोलेबाजीवरून आंबेडकर यांचा विरोधी पक्षावर जोरदार निशाणा

मुंबई: एकीकडे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसऱ्या बाजूला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय जुगलबंदी सुरू आहे. सत्ताधाऱ्यांकडून सरकार पाडण्याची आव्हानं दिली जाता असताना विरोधकांकडून सरकारला तीन चाकी रिक्षाची उपमा दिली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या या जुगलबंदीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विपश्यना करण्याचा सल्ला दिला आहे.राज्य कोरोना संकटातून जात असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. त्यावरून वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. 'सत्तेसाठी कासावीस झालेल्या भाजपाच्या चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे विरोधीपक्ष म्हणून प्रतीक्षा करावी आणि ते शक्य नसल्यास इगतपुरीमध्ये जावून विपश्यना करावी,' असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाच्या दोन प्रमुख नेत्यांना दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे लॉकडाऊन न वाढवण्याची मागणी केलेली आहे. लॉकडाऊन न हटवल्यास माणसं उपासमारीनं मरतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. 'उद्धव ठाकरे, यांना विनंती… खुदा होऊ नका. कोरोना विषाणूनं सगळ्यांना भीती घातली. मीसुद्धा त्यावेळी घाबरलो होतो. ४० टक्के लोक बाधित होतील, असं अमेरिकेच्या हॉपकिन युनिव्हर्सिटीनं म्हटलं होतं. पण त्याच्याच आठवड्याभरानंतर भारतात कोरोना पसरु शकणार नाही, असं ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी सांगितलं. भारतीयांची रोगप्रतिकार शक्ती फार चांगली असल्याचं तिथल्या शास्त्रज्ञांनी म्हटलं,' असा संदर्भ आंबेडकरांनी दिला.लॉकडाऊन न वाढवता अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मागे लागण्याचं आवाहन आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना केलं. 'बुद्धांनी एक गोष्ट सांगितली आहे, की माणसं जन्माला आली, की त्यांचं मरण निश्चित. त्यामुळे आता आपण अर्थव्यवस्था सुधारण्याच्या पाठीमागे लागावं. तरच माणसं जगतील, अन्यथा उपासमारीनं माणसं मरतील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवू नका,' असं आवाहन आंबेडकरांनी केलं आहे.

"महाविकास आघाडीच्या रिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंकडे, पण कुठं जायचं हे ठरवतात मागे बसणारे"आपले प्रेरणादायी शब्द उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील, उद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार"हा दिवस म्हणजे, भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची संधी", वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदींचे उद्धव ठाकरेंना पत्र

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा