शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 13:15 IST

Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात ४८ पैकी किती जागा मिळतील, याचा प्रकाश आंबेडकर यांनी थेट आकडाच सांगितला.

Prakash Ambedkar: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता देशातील काही ठिकाणी दोन टप्प्याचे मतदान होणार आहे. यानंतर ०४ जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. तर, महायुतीत भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत दोन आघाड्यांमध्ये आहे, असे सांगताना, वंचित बहुजन आघाडीला ४८ पैकी ३ जागा मिळतील, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली

पंतप्रधान मोदी प्रचारादरम्यान वैयक्तिक हल्ले करत आहेत, जे वाईट आहे. पंतप्रधानांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा खालावली आहे. सत्ताधारी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणेचा कसा वापर करतात, हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचे रूपांतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखे केले आहे. पंतप्रधान मोदी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रचार करतात. विधानसभा निवडणुकीतही तेच प्रचाराला जातात. स्थानिक पातळीवरील निवडणुकीतही पंतप्रधान मोदी हेच करतात, या शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला. प्रकाश आंबेडकर इंडियन एक्स्प्रेसशी बोलत होते.

दरम्यान, तत्कालीन पंतप्रधानांनी आपापल्या पक्षांचा प्रचार केला हे खरे असले तरी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली आहे, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४