मुंबई-ठाण्यासह 17 मतदारसंघामध्ये चौथ्या टप्प्यात मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 20:39 IST2019-03-10T20:37:51+5:302019-03-10T20:39:07+5:30
चौथ्या टप्प्यामध्ये मुंबई आणि ठाण्यामधील सर्व मतदार संघांसह नाशिक, नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यातील मतदार संघात 29 एप्रिल रोजी मतदान होईल.

मुंबई-ठाण्यासह 17 मतदारसंघामध्ये चौथ्या टप्प्यात मतदान
मुंबई - 17 व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या कार्यक्रमानुसार देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. 11 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा पहिला तर 19 मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल. तर 23 मे रोजी मतमोजणी होईल. महाराष्ट्रामध्ये एकूण चार टप्प्यात मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यामध्ये मुंबई आणि ठाण्यामधील सर्व मतदार संघांसह नाशिक, नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यातील मतदार संघात 29 एप्रिल रोजी मतदान होईल.
चौथ्या टप्प्यामध्ये मतदान होणारे मतदार संघ
मतदानाची तारीख 29 एप्रिल
मतदार संघ - नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर,भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, मावळ, शिरूर, शिर्डी