शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

देशभरातील पोलीस दल सक्षम करणार : जी. किशन रेड्डी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 20:20 IST

टीव्ही, चित्रपटातून पोलिसांची चुकीची प्रतिमा सादर केली जाते़....

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप पोलीस हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली

पुणे : देशातील सर्व राज्यातील पोलीस दलांचे सक्षमीकरण करणार केंद्र सरकार लक्ष देत आहे़. त्यासाठी केंद्र सरकार आवश्यक तो निधी कमी पडू देणार नाही, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी़ किशन रेड्डी यांनी रविवारी सांगितले़.  त्यांनी पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रातील पोलीस हुतात्मा स्मारकाला रेड्डी व केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी भेट दिली व हुतात्मांना श्रद्धांजली अर्पण केली़. रेड्डी यांनी सांगितले की, दिल्लीत नॅशनल पोलीस मेमोरियल सेंटर उभारले आहे़ देशभरातील ३४६ जिल्हा मुख्यालयांपैकी ३०० जिल्हा मुख्यालयात पोलीस हुतात्मा स्मारक उभारले आहे़. टीव्ही, चित्रपटातून पोलिसांची चुकीची प्रतिमा सादर केली जाते़. ते बदलण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे़. पोलीस सण, समांरभा आपल्या कुटुंबासमवेत साजरे करु शकत नाही़. आपले आपल्या सरंक्षणासाठी ते त्याग करतात़ त्यांची जाणीव समाजाने ठेवली पाहिजे़. एखाद्याने चुकीची गोष्ट केली म्हणजे सर्व पोलिसांना बदनाम करता कामा नये़. पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रशिक्षणावर सरकारने भर दिला आहे़. राज्य सरकारांना फॉरेन्सिक लॅब, आधुनिकीकरणासाठी निधी दिला जात आहे़. जेव्हा केव्हा कोणावर संकट येते, तेव्हा सरकारचा माणुस म्हणून पोलीस सर्वप्रथम पोहचतात़ पोलिसांच्या कामाला सर्वांनी धन्यवाद दिले पाहिजे़. ़़पोलीस परिषद सफलपाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (आयसर) आयोजित केलेल्या तीन दिवसीय वार्षिक राष्ट्रीय पोलीस महासंचालक परिषदेसाठी ते पुण्यात आले होते़. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत रविवारी या परिषदेचा समारोप झाला़. तीन दिवसांची ही परिषद सफल झाल्याचे जी़ किशन रेड्डी यांनी सांगितले़. मात्र, परिषदेबाबत अधिक काही सांगण्यास त्यांनी नकार दिला़.  

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी