शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 18:26 IST

"ज्या मुंबईत प्रत्येक मिनिटाचे महत्व आहे. तेथे तीन चार वर्षांपर्यंत या सुविधेपासून मुंबईकर वंचित रिहिले. हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही..."

बंधूंनो आपण अशा संस्कारात वाढलो आहोत, जेथे राष्ट्रीय धोरणच राजकारणाचा आधार आहे. आमच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरवर लागणारा प्रत्येक पैसा देशवासीयांची सुविधा आणि सामर्थ्य वाढवण्याचे माध्यम आहे. मात्र दुसऱ्या बाजूला, देशात एक असा राजकीय विचारही राहिला आहे, जो जनतेच्या सुविधेला नव्हे, तर सत्येच्या सुविधेला अधिक महत्व देतो. हेच लोक विकास कामात अडथळे निर्माण करतात. घोटाळे करून विकासाशी संबंधित प्रोजेक्ट विकासाच्या पटरीवरून खाली खेचतात. अनेक दशके देशाने असे नुकसान पाहिले आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर थेट हल्ला चढवला. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

"आज ज्या मेट्रो लाइनचे लोकार्पन झाले आहे, ते त्या लोकांच्या कारनाम्यांचीही आठवण करून देते. मी भूमीपूजनासाठी आलो होतो. तेव्हा लाखो लोकांना आशा वाटत होती की, त्यांचा त्रास कमी होईल. मात्र नंतर, काही काळासाठी जे सकरार आले, त्या सरकारने हे कामच थांबवले होते. त्यांना सत्ता मिळाली. मात्र देशाला हजारो कोटींचे नुकसान झाले होते. एवढ्या वर्षांपर्यंत असुविधा निर्माण झाली. असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी नाव न घेता तत्कालीन मविआच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला. तसेच, "आता ही मेट्रोलाईन झाल्याने दोन-अडीच तासांचा प्रवास तीस चाळीस मिनिटांत होईल, असेही मोदी म्हणाले.

मोदी पुढे म्हणाले, "ज्या मुंबईत प्रत्येक मिनिटाचे महत्व आहे. तेथे तीन चार वर्षांपर्यंत या सुविधेपासून मुंबईकर वंचित रिहिले. हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही. गेल्या 11 वर्षांपासून देशवासीयांचे जीवन सोपे करण्यावर जोर दिला जात आहे. यामुळे रेल्वे, रोड, एअरपोर्ट, मेट्रो, इलेक्ट्रिकबस, आंदींवर अभूतपूर्व गुंतवणूक केली जात आहे." एवढेच नाही तर, "अटल सेतू आणि कोस्टल रोड सारखे प्रोडेक्ट तयार करण्यात आले आहेत. दळवणाचे प्रत्येक माध्यम एकमेकांशी जोडले जात आहे. लोकांना सीमलेस ट्रॅव्हल मिळे, एका माध्यमापासून दुसऱ्या माध्यमापर्यंत भटकणे भाग पडू नये, यासाठी प्रयत्न केला जात आहे." असेही मोदी यावेळी म्हणाले.

   

 

English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi slams Thackeray government for halting key infrastructure project.

Web Summary : PM Modi criticized the previous government for stalling a vital metro project, causing significant inconvenience to Mumbaikars. He highlighted the current government's focus on seamless connectivity and infrastructure development to ease citizens' lives, citing projects like Atal Setu.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMumbaiमुंबईMetroमेट्रोUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी