शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

संभाजी भिडे गुरुजींना 8 दिवसांत अटक करा, अन्यथा...- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 4:40 PM

संभाजी भिडे गुरुजींना आठ दिवसांत अटक करा, अन्यथा सरकारनं याचे गंभीर परिणाम भोगायला तयार राहावे, असा इशारा आज भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.

मुंबई- संभाजी भिडे गुरुजींना आठ दिवसांत अटक करा, अन्यथा सरकारनं याचे गंभीर परिणाम भोगायला तयार राहावे, असा इशारा आज भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. एल्गार रॅलीच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी संभाजी भिडे गुरुजींना पाठीशी घालत आहेत. सरकारनं कोर्टाचं काम करू नये, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघानं एल्गार मोर्चा काढला होता. त्या एल्गार मोर्चाला आंबेडकरी जनतेनं चांगला प्रतिसाद दिला. जिजामाता उद्यान ते विधान भवनदरम्यान काढण्यात आला असून, भारिप बहुजन महासंघाच्या एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तर दुसरीकडे आझाद मैदानावरील आंदोलनास पोलिसांकडून मंजुरी देण्यात आली होती. प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना अल्टिमेटमही दिला आहे. भिडेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींना फूस आहे की भिडे मोदींना फूस लावतायत हे पाहावं लागेल. संभाजी भिडे आरोपी नंबर एक आहेत एकबोटे आरोपी नंबर दोन आहेत. आरोपी 2 वर कारवाई होते तर आरोपी एकवर का नाही ?, असा प्रश्नही आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. भिडे यांना अटक करायची असेल तर रावसाहेब पाटील यांची पोस्ट आहेच. त्यावर मुख्यमंत्र्यांना मारून टाका असं लिहिलं होतं. त्यावर संभाजी भिडेंचा फोटो होता. रावसाहेब पाटील यांना अटक करा त्यांच्यापासून भिडेंपर्यंत पोहोचता येईल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. 

टॅग्स :Elgar morchaएल्गार मोर्चाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर