शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'अशा घोषणा राज्यातील लोकांना आवडणार नाहीत', अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 18:14 IST

अजित पवार आणि पंकजा मुंडे यांच्यानंतर आता खा. अशोक चव्हाण यांनीदेखील सीएम योगी आदित्यनाथांच्या घोषणेचा विरोध केला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेमुळे राज्यातील राजकीय तापमान चांगलेच तापले आहे. एकीकडे विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे, तर दुसरीकडे महायुतीचे नेतेही या घोषणेपासून स्वतःला दूर ठेवत आहेत. 

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अप) प्रमुख अजित पवार यांच्यानंतर, भाजपच्या नेत्या आ. पंकजा मुंडे, आता काही काळापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या खा. अशोक चव्हाण यांनी या घोषणेचा विरोध केला आहे. 

'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा पूर्णपणे अप्रासंगिक असून, महाराष्ट्रातील जनतेला ती आवडणार नाही. या घोषणेचा इथे फारसा संबंध नाही. निवडणुकीच्या काळात घोषणाबाजी केली जाते. पण, ही विशिष्ट घोषणा चांगली नाही आणि लोकांना ती आवडेल, असे मला वाटत नाही. व्यक्तिशः मी अशा घोषणांच्या विरोधात आहे. यातून कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत, हे पाहावे लागेल, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.

पंकजा मुंडेचाही विरोधयापूर्वी भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनीही या घोषणेची महाराष्ट्राला गरज नाही, असे म्हटले होते. आपण एकाच पक्षाचे आहोत म्हणून त्याचे समर्थन करू शकत नाही. माझा विश्वास आहे की, विकास हाच खरा मुद्दा असायला हवा. या पृथ्वीतलावर राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आपला मानणे हे नेत्याचे काम असते. असे विषय महाराष्ट्रात आणू नयेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. 

याशिवाय, अजित पवार यांनीदेखील अशा घोषणा महाराष्ट्रात चालणार नाहीत, असे म्हटले होते. या यूपीत चालतात, महाराष्ट्रात अजिबात चालणार नाही. महाराष्ट्र हा ऋषी, संत, शिवप्रेमी आणि आंबेडकरांचा आहे. त्यांनी शिकवलेल्या गोष्टी आमच्या रक्तात आहेत आणि आम्ही त्याच मार्गावर जाऊ. मुस्लिमांच्या भावना दुखावू देणार नाही, असे अजित पवार म्हणाले होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ashok Chavanअशोक चव्हाणPankaja Mundeपंकजा मुंडेAjit Pawarअजित पवारyogi adityanathयोगी आदित्यनाथ