शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शेतकऱ्यांना श्रद्धांजली काय वाहता, परिवर्तन घडवा!

By admin | Published: October 26, 2015 2:48 AM

उत्पादन खर्चाच्या तुलनेत न मिळणारा भाव, नैसर्गिक आपत्ती अशा समस्यांच्या गर्तेत कापूस उत्पादक अडकला आहे. त्यातून आत्महत्या होतात

जळगाव : उत्पादन खर्चाच्या तुलनेत न मिळणारा भाव, नैसर्गिक आपत्ती अशा समस्यांच्या गर्तेत कापूस उत्पादक अडकला आहे. त्यातून आत्महत्या होतात. आपण श्रद्धांजली वाहण्याची जबाबदारी पार पडतो. पण ही श्रद्धांजली वाहण्याऐवजी कापूस क्षेत्रातील सर्व उद्योजक, शास्त्रज्ञ यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी विश्वसनीय, ठोस काम करायला हवे. मूल्यवर्धनावर भर द्यायला हवा, असे आवाहन मुंबई येथील कोटक ग्रुपचे सर्वेसर्वा तथा जागतिक कापूस बाजारपेठेचे अभ्यासक सुरेश कोटक यांनी केले.जैन हिल्सवरील गांधी तीर्थवरील सभागृहात रविवारी महाकॉट संमेलन झाले. कपाशीच्या तंत्रज्ञानाबाबत आपण मागे असल्याने उत्पादकताही कमी आहे. थ्री जीएम (जेनेटीकली मॉडीफाईड) तंत्र अजून नाही. देशाची कापूस उत्पादकता ३०० ते ४०० किलो रुई प्रतिहेक्टरवर अडकली आहे. चीनने यंदा १,५०० किलो रुई प्रतिहेक्टरी उत्पादकता गाठण्याचे ठरविले आहे. त्याचा विचार देशातील शास्त्रज्ञ, शासन व इतर संस्थांनी करावा. आपल्याकडे कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते; पण उत्पादन येत नाही. दुसरीकडे इतर देशांमध्ये लागवड कमी क्षेत्रावर होते, पण उत्पादनात ते भारताला मागे टाकण्याची स्पर्धा करतात, असेही कोटक म्हणाले. गुजरातने शंकर हा रुईचा ब्रॅण्ड विकसित केला आहे. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आफ्रिकेतील देशांच्या तुलनेत भारतातील रुई स्वस्त केली आहे. ब्रॅण्डींग करताना आपल्या रुईचे दर आपल्या मागे असलेल्या देशांमधील रुईच्या तुलनेत अधिक हवेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.