शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

बीएसएनएल निर्णायक संघर्षाच्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 06:31 IST

बीएसएनएल या सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनीतील २ लाख कर्मचारी आणि अधिकारी ३ डिसेंबर २०१८ पासून देशव्यापी बेमुदत संपावर जात आहेत.

- रंजन दाणी/गुलाब काळे ।बीएसएनएल या सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनीतील २ लाख कर्मचारी आणि अधिकारी ३ डिसेंबर २०१८ पासून देशव्यापी बेमुदत संपावर जात आहेत. सध्या टेलीकॉम क्षेत्रात तीव्र स्पर्धा सुरू असून, अनेक खासगी कंपन्यांनी या उद्योगातून माघार घेतली आहे. हजारो कोटी रुपयांचे बँक कर्ज घेऊन ज्यांनी आपला उद्योग बंद केला, त्यांचे कर्जाचे ओझे सामान्य करदात्यांच्याच डोक्यावर बसणार आहे.१९९१मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने साम्राज्यवादी जगतिकीकरणाचे धोरण स्वीकारले आणि सर्वच क्षेत्रांवर त्याचा अनिष्ट परिणाम झाला. नॅशनल टेलीकॉम पॉलिसी १९९४ आणि १९९९ च्या माध्यमातून खासगी कंपन्यांनी दूरसंचार व्यवसायात प्रवेश केला. १९९५ ते २००२ या तब्बल ७ वर्षांच्या कालावधीत मोबाइलच्या उद्योगात केवळ खासगी कंपन्यांनाच परवानगी देऊन ‘स्पर्धेच्या’ नावाने खाजगी कंपन्यांची मक्तेदारी लादली गेली. आउटगोइंग कॉल १८ रुपये, तर इनकमिंग कॉल ९ रुपये एवढे प्रचंड दर आकारून या कंपन्यांनी जनतेची अक्षरश: लूूट केली. खासगी कंपन्यांनी विदेशातून येणारे कॉल देशातून आल्याचे दाखवून बीएसएनएल या सार्वजनिक कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान केले.बीएसएनएलला मोबाइल सेवेसाठी परवानगी मिळावी, म्हणून या खात्यातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संघटनांनी एकत्र अनेक आंदोलने केली. २००२ मध्ये बीएसएनएल कंपनीचा मोबाइल क्षेत्रात प्रवेश झाला. सर्वप्रथम बीएसएनएलने इनकमिंग कॉल फ्री केला, दर कमी केले आणि सामान्यांच्या हाती मोबाइल दिसू लागला. कृषी प्लॅनसारखी योजना अत्यंत लोकप्रिय झाली आणि खेड्यापाड्यांत व दुर्गम भागात मोबाइलचा अफाट विस्तार झाला. अवघ्या तीनच वर्षांत त्या काळातील आघाडीच्या खासगी कंपनीला मागे टाकून बीएसएनएल पुढे जाईल की काय, अशी स्थिती निर्माण झाली. येथूनच बीएसएनएलला संपविण्याचे कारस्थान सरकारी पातळीवर झाले.बीएसएनएलला २००४-०५ मध्ये १० हजार कोटींचा नफा झाला. २००७-०८ मध्ये ९५ मिलियन मोबाइल लाइनचे टेंडर रद्द करून सरकारने बीएसएनएलवर मोठा आघात केला. झपाट्याने होऊ पाहणाºया विस्ताराला एकदम ब्रेक लावला गेला. पुन्हा एकदा सर्व संघटनांनी देशव्यापी संप करून अंशत: का होईना, सरकारला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडले. यानंतर मात्र, सरकारने एडीसी चार्जेस रद्द केले. बीडब्ल्यूए स्पेक्ट्रमच्या नावाने १८,५०० कोटी रुपयांसह ३० हजार कोटींची गंगाजळी काढून बीएसएनएलला कफल्लक बनविले.संप, लढे व ट्रेड युनियन चळवळीचा दबाव आणि केंद्रातील सत्ताबदलामुळे बीएसएनएलने पुन्हा भरारी घेण्यास सुरुवात केली. २००९ ते २०१३ पर्यंत तोट्यात असलेली ही कंपनी २०१५-१६ पासून आॅपरेशनल प्रॉफिटमध्ये आली. पुढे सरकारने दिलेले ४-जी स्पेक्ट्रम आणि बँकांचे मोठे कर्ज याद्वारे केवळ एकाच खासगी कंपनीने संपूर्ण देशात सेवा सुरू केली आणि ‘उत्पादन खर्चावर आधारित दर’ ही संकल्पना मोडीत निघाली. खुद्द पंतप्रधानांनी त्यांच्या सिम कार्डची जाहिरात करावी, हा तर बीएसएनएलला संपविण्यासाठीचा तो एक राजाश्रय होता! आणि यासाठी जे हत्यार वापरले गेले, ते ‘फुकट सेवेचे.’ सलग दोन वेळा ट्रायचे नियम धाब्यावर बसवून फुकट सेवा दिली गेली. २७% टक्क्यांनी कंपनीच्या उत्पन्नात घट झाली. त्याने दोन वर्षांत बीएसएनएलची प्रचंड आर्थिककोंडी झाली.बीएसएनएलला बंद करून मर्जितल्या खासगी कंपनीला ग्राहकांना वाटेल तसे लुटण्याचाच परवाना देण्यासाठी हा खटाटोप आहे. ग्राहकांच्या विश्वासावर आम्ही आजवर वाटचाल सुरू ठेवली. ६५ हजार टॉवर्स वेगळे करून बीएसएनएलला मोडीत काढण्याचे धोरण हाणून पाडले. त्या विरोधात देशातील २ लाख कर्मचारी व अधिकाºयांनी लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. हा लढा कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी तर आहेच. कारण आजही बीएसएनएलमध्ये ‘डेप्युट’ केलेल्या उच्चपदस्थ अधिकाºयांना सातवा वेतन आयोग मिळतो आणि कामगार-कर्मचाºयांना वाºयावर सोडले जाते, ही बाब संघटना मुकाट सहन करू शकत नाही.

(बीएसएनएल कर्मचारी संघटना)

टॅग्स :BSNLबीएसएनएल