शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

औरंगाबादमध्ये ११ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत अंशतः लॉकडाऊन 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 9:41 PM

Aurangabad Lockdown : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता निर्णय. शनिवार आणि रविवारी १०० टक्के लॉकडाऊन

ठळक मुद्देकोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता घेण्यात आला निर्णय शनिवार, रविवारी १०० टक्के लॉकडाऊन

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येत्या ११ मार्चपासून औरंगाबादमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा रविवारी करण्यात आली. ११ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. औरंगाबादमधील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, राजकीय सभा, धार्मिक सभा, क्रीडा स्पर्धा याकाळात बंद ठेवण्यात येणार आहेत. तसंच या कालावधीमध्ये आठवडी बाजारही बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, शनिवार रविवार पूर्ण लॉकडाऊन असलं तरी या कालावधीत वैद्यकीय सेवा, माध्यमांची कार्यालये, दुध विक्री, भाजीपाला आणि फळविक्री सुरू ठेवण्यात येणार आहे. "गर्दी टाळता येईल आणि अनावश्यक गर्दी होऊ नये, कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या वेगानं वाढतोय त्याला आळा घालता येईल अशा प्रकारचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतला आहे. संपूर्ण शहरात मास्कचा वापर केला गेला पाहिजे, सुरक्षित अंतरही ठेवलं पाहिजे या सर्व बाबींकडे लक्ष देण्यात आलं आहे. सर्वांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला पाहिजे," असं मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. "नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला तरच जे काही शासन, स्थानिक प्रशासन उपाययोजना करत आहे त्याचा परिणाम दिसून येईल. आज मंत्रिमंडळातही कोरोनावर सादरीकरण झालं. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील सर्वांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगितलं. तसंच अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे, सर्वांनी मास्क वापरलं पाहिजे, सुरक्षित अंतर ठेवलं पाहिज अशा सूचनाही त्यांनी केल्या. शासन आणि स्थानिक प्रशासनानंदेखील याची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. परंतु नागरिकांचं सहकार्य हे महत्त्वाचं आहे. कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू नये अशी चिंतादेखील बैठकीत व्यक्त करण्यात आली," असंही त्यांनी नमूद केलं.शनिवार, रविवार पूर्ण लॉकडाऊन

औरंगाबादमध्ये ११ मार्चपासून ४ एप्रिल पर्यंत अंशतः लॉकडाऊन लागू केला जाणार आहे. तसंच या कालावधीत विवाह सोहळे रद्द करण्याचे आदेश टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिले. दर शनिवारी आणि रविवारी आवश्यक सेवा वगळता १०० टक्के लॉकडाऊन असणार आहे. याव्यतिरिक्त जाधवमंडी बुधवार पासून बंद राहणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.  

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदे