शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

परळीतील दगडफेकीची पोलिसांकडून चौकशी

By admin | Updated: June 8, 2014 02:14 IST

दगडफेक यांसारख्या घटना रोखण्यात पोलीस यंत्रणा कुठे कमी पडली का, याची महाराष्ट्र पोलीस खात्याने अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.

गोपीनाथ मुंडेंचे अंत्यसंस्कार : परिस्थितीचे आकलन कमी पडले का?
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या परळीत झालेल्या अंत्यसंस्कारांच्या वेळी शोकाकुल जनसमुदायाच्या तीव्र भावनांची पूर्वकल्पना घेऊन  त्यातून नंतर घडलेल्या घोषणाबाजी व दगडफेक यांसारख्या घटना रोखण्यात पोलीस यंत्रणा कुठे कमी पडली का, याची महाराष्ट्र पोलीस खात्याने अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.
अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांची मोठी संख्या व त्यांच्या मुंडेंविषयी असलेल्या तीव्र भावना लक्षात घेता घोषणाबाजी व दगडफेक यांसारख्या घटना घडू शकतात याची पूर्वकल्पना बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना आली होती का व अशा अप्रिय घटना घडू नयेत यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक पावले उचलली गेली होती का याविषयीचा लेखी अहवाल त्या दिवशी (4 जून) परळीत नेमणुकीवर असलेले पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षकांकडून मागविण्यात आला आहे, असे राज्य पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ अधिका:याने ‘लोकमत’ला सांगितले. हा ‘आयपीएस’ अधिकारी म्हणाला की, त्या दिवशी जे काही घडले त्याची तपशीलवार माहिती देणारा तसेच दगडफेक होऊ नये यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय केले गेले होते का याचीही नोंद असलेला अहवाल देण्यास तेथे हजर असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिका:यांना सांगण्यात आले आहे. या अहवालाची शहानिशा करून तो पोलीस महासंचालकांना सादर केला जाईल.
परळीतील त्या दिवशीची परिस्थिती हाताळण्यात पोलीस यंत्रणा कमी पडली असे अहवालातून दिसून आले तर, भविष्यात याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी, आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही हा अधिकारी म्हणाला.
मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी त्या शोकाकुल अवस्थेतही स्वत: माईक हातात घेऊन कार्यकत्र्याना खुद्द मुंडेंची शपथ घालून शांत केले होते; तसेच त्यांनी या घटनेच्या चौकशीचीही मागणी केली होती.
 
यासंदर्भात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाला की, गेल्या काही वर्षात राज्यात अशाच प्रकारे अफाट लोकप्रियता असलेल्या इतरही काही राजकीय नेत्यांचे (विलासराव देशमुख, बाळासाहेब ठाकरे) निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीच्या वेळीही असाच लाखोंचा जनसागर लोटला होता. परंतु त्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा कोणताच प्रश्न निर्माण झाला नाही. परंतु मुंडे यांचा अचानक झालेला मृत्यू कार्यकत्र्याच्या दृष्टीने धक्कादायक होता व त्याच धक्क्याचे पर्यावसान अंत्यविधीच्या वेळी काही प्रमाणात संतापात झालेले असू शकते.