शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...नाहीतर तुम्ही राजकारणातून सन्यास घ्या; संजय राऊतांचा पंकजा मुंडेंना खोचक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 12:09 IST

गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा महाराष्ट्रात उभी करण्यासाठी रक्ताचे पाणी केले. महाराष्ट्रातल्या भाजपाला अच्छे दिन दाखवले असं राऊत म्हणाले.

मुंबई - गोपीनाथ मुंडे असते तर नक्कीच शिवसेना-भाजपाला वेगळी दिशा मिळाली असती. आज जे चित्र दिसतेय ते नसते. मुंडे नसल्याने आज त्यांच्या कुटुंबाची राजकारणात वाताहत केली जातेय हे स्पष्ट दिसते अशा परिस्थितीत परिवारातील प्रमुख व्यक्ती जी राजकारणात आहे त्यांनी साहसाने, हिंमतीने परिणामांची पर्वा न करता निर्णय घेणे गरजेचे असते. जर निर्णय घेता येत नसेल तर राजकारणातून सन्यास घ्यावा असा खोचक सल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे. 

संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा महाराष्ट्रात उभी करण्यासाठी रक्ताचे पाणी केले. महाराष्ट्रातल्या भाजपाला अच्छे दिन दाखवले. अनेक बहुजन समाजातील नेते ज्यांनी भाजपा महाराष्ट्रातून शून्यातून उभी केली. त्या मुंडे कुटुंबाचे अस्तित्व महाराष्ट्राच्या राजकारणात राहू नये यासाठी दिल्लीत आणि इथं प्रयत्न सुरू आहेत. पंकजा मुंडे यांचा पराभव का आणि कसा झाला हे सांगण्याची गरज नाही. मुंडे कुटुंबाबद्दल आमच्या मनात आस्था आहे. गोपीनाथ मुंडे असते तर आज जे चित्र असते ते दिसले नसते. मुंडे कुटुंबाची राजकारणात वाताहात केली जातेय. परिणामांची पर्वा न करता निर्णय घेणे अपेक्षित आहे. तरच तुम्ही राजकारणात टिकू शकता तुम्हाला निर्णय घेता येत नसेल तर राजकारणातून सन्यास घ्यावा, आमच्यावर अन्याय होतोय या रडगाण्याला कुणी विचारत नाही असं विधान त्यांनी केले. 

राहुल गांधी सध्या फॉर्मातराहुल गांधी अमेरिकेत असून त्यांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय, जे येतायेत ते भाड्याने येत नाही. सचिन तेंडुलकर, विराट कोहलीसारखे राहुल गांधी सध्या फॉर्मात आहे. जोरदार बॅटिंग करतायेत. संसद सदस्यत्व रद्द झालंय, घर सोडावे लागले. पासपोर्ट काढून घेतला तरी राहुल गांधी देशासाठी लढाई लढतायेत. मोदी आणि त्यांचे नेते याआधी काय करायचे. देशाबाहेर आपल्या समुदायासमोर देशातील स्थिती सांगितली तर त्याला अपमान कसं म्हणता येईल? असं सांगत संजय राऊतांनी भाजपा नेत्यांवर पलटवार केला आहे. 

उद्धव ठाकरे पटणाला जाण्याच्या विचारात१२ जून रोजी सर्व प्रमुख नेत्यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निमंत्रण दिले आहे. भाजपासोबत नसलेल्यांना हे निमंत्रण आहे. २०२४ मध्ये ज्यांना परिवर्तन घडवायचे आहे त्या देशभक्त पक्षांची बैठक बोलावली आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंना त्यांनी महाराष्ट्रात येऊन निमंत्रण दिले आहे.  आम्हीदेखील पटणाला जाण्याचा विचार करतोय अशी माहिती संजय राऊतांनी दिली. 

शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल  अहिल्यादेवी होळकर यांनी राज्य कारभार उत्तम सांभाळला, मराठेशाही पुढे नेली. महाराष्ट्र सदनात अहिल्यादेवींचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सरकारला उपरती आली. अहिल्यादेवींच्या नावाने एखादा जिल्हा ओळखला जाणार असेल तर त्याचे स्वागत आहे अशी प्रतिक्रिया राऊतांनी अहमदनगरच्या नामांतरणावर दिली. 

त्याचसोबत महिला कुस्तीपटूला न्याय मिळावा ही सगळ्यांची भूमिका आहे. पण त्यांना न्याय पंतप्रधान आणि भाजपा सरकार नाकारत आहे. गजानन किर्तीकरांनी जे विधान केले ते सगळ्यांनी ऐकले आहे. आता त्यांनी घुमजाव केले त्यांच्यावर दबाव असू शकतो. गजानन किर्तीकरांचे स्टेटमेंट त्यांनी पुन्हा ऐकावे असं सांगत राऊतांनी भाजपावर आरोप केले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपा