शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

...नाहीतर तुम्ही राजकारणातून सन्यास घ्या; संजय राऊतांचा पंकजा मुंडेंना खोचक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 12:09 IST

गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा महाराष्ट्रात उभी करण्यासाठी रक्ताचे पाणी केले. महाराष्ट्रातल्या भाजपाला अच्छे दिन दाखवले असं राऊत म्हणाले.

मुंबई - गोपीनाथ मुंडे असते तर नक्कीच शिवसेना-भाजपाला वेगळी दिशा मिळाली असती. आज जे चित्र दिसतेय ते नसते. मुंडे नसल्याने आज त्यांच्या कुटुंबाची राजकारणात वाताहत केली जातेय हे स्पष्ट दिसते अशा परिस्थितीत परिवारातील प्रमुख व्यक्ती जी राजकारणात आहे त्यांनी साहसाने, हिंमतीने परिणामांची पर्वा न करता निर्णय घेणे गरजेचे असते. जर निर्णय घेता येत नसेल तर राजकारणातून सन्यास घ्यावा असा खोचक सल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे. 

संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा महाराष्ट्रात उभी करण्यासाठी रक्ताचे पाणी केले. महाराष्ट्रातल्या भाजपाला अच्छे दिन दाखवले. अनेक बहुजन समाजातील नेते ज्यांनी भाजपा महाराष्ट्रातून शून्यातून उभी केली. त्या मुंडे कुटुंबाचे अस्तित्व महाराष्ट्राच्या राजकारणात राहू नये यासाठी दिल्लीत आणि इथं प्रयत्न सुरू आहेत. पंकजा मुंडे यांचा पराभव का आणि कसा झाला हे सांगण्याची गरज नाही. मुंडे कुटुंबाबद्दल आमच्या मनात आस्था आहे. गोपीनाथ मुंडे असते तर आज जे चित्र असते ते दिसले नसते. मुंडे कुटुंबाची राजकारणात वाताहात केली जातेय. परिणामांची पर्वा न करता निर्णय घेणे अपेक्षित आहे. तरच तुम्ही राजकारणात टिकू शकता तुम्हाला निर्णय घेता येत नसेल तर राजकारणातून सन्यास घ्यावा, आमच्यावर अन्याय होतोय या रडगाण्याला कुणी विचारत नाही असं विधान त्यांनी केले. 

राहुल गांधी सध्या फॉर्मातराहुल गांधी अमेरिकेत असून त्यांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय, जे येतायेत ते भाड्याने येत नाही. सचिन तेंडुलकर, विराट कोहलीसारखे राहुल गांधी सध्या फॉर्मात आहे. जोरदार बॅटिंग करतायेत. संसद सदस्यत्व रद्द झालंय, घर सोडावे लागले. पासपोर्ट काढून घेतला तरी राहुल गांधी देशासाठी लढाई लढतायेत. मोदी आणि त्यांचे नेते याआधी काय करायचे. देशाबाहेर आपल्या समुदायासमोर देशातील स्थिती सांगितली तर त्याला अपमान कसं म्हणता येईल? असं सांगत संजय राऊतांनी भाजपा नेत्यांवर पलटवार केला आहे. 

उद्धव ठाकरे पटणाला जाण्याच्या विचारात१२ जून रोजी सर्व प्रमुख नेत्यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निमंत्रण दिले आहे. भाजपासोबत नसलेल्यांना हे निमंत्रण आहे. २०२४ मध्ये ज्यांना परिवर्तन घडवायचे आहे त्या देशभक्त पक्षांची बैठक बोलावली आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंना त्यांनी महाराष्ट्रात येऊन निमंत्रण दिले आहे.  आम्हीदेखील पटणाला जाण्याचा विचार करतोय अशी माहिती संजय राऊतांनी दिली. 

शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल  अहिल्यादेवी होळकर यांनी राज्य कारभार उत्तम सांभाळला, मराठेशाही पुढे नेली. महाराष्ट्र सदनात अहिल्यादेवींचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सरकारला उपरती आली. अहिल्यादेवींच्या नावाने एखादा जिल्हा ओळखला जाणार असेल तर त्याचे स्वागत आहे अशी प्रतिक्रिया राऊतांनी अहमदनगरच्या नामांतरणावर दिली. 

त्याचसोबत महिला कुस्तीपटूला न्याय मिळावा ही सगळ्यांची भूमिका आहे. पण त्यांना न्याय पंतप्रधान आणि भाजपा सरकार नाकारत आहे. गजानन किर्तीकरांनी जे विधान केले ते सगळ्यांनी ऐकले आहे. आता त्यांनी घुमजाव केले त्यांच्यावर दबाव असू शकतो. गजानन किर्तीकरांचे स्टेटमेंट त्यांनी पुन्हा ऐकावे असं सांगत राऊतांनी भाजपावर आरोप केले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपा