शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

पंढरपूर वारी २०१९ : वारकऱ्यांची पाऊले स्थिरावली पंढरीत...पाप पुण्याच्या राशी सुटल्या विठुरायाच्या नगरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 8:20 PM

आषाढी वारीने पंढरीस निघालेल्या संतांच्या पालख्यांसह लाखो वैष्णव गुरुवारी ( दि.११जुलै ) पंढरी नगरीत दाखल झाल्या आहेत.

ठळक मुद्देभजन, कीर्तन, माऊली  तुकारामाचा जयघोषात पंढरपूर भक्तिमय वातावरण

धन्य आजि दिन । जालें संतांचे दर्शन॥जाली पापातापा तुटी । दैन्य गेले उठाउठी॥

जालें समाधान । पायी विसावले मन॥ तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळी दसरा॥

पंढरपूर : टाळ-मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून खळाळत वाहणारा विठ्ठलभक्तीचा प्रवाह गुरुवारी चंद्रभागारूपी महासागरात विलीन झाला. आषाढी वारीने पंढरीस निघालेल्या संतांच्या पालख्यांसह लाखो वैष्णव आज पंढरी नगरीत दाखल झाल्या आहेत .

पालखी सोहळे पंढरपूरमध्ये दाखल होताना नगरवासीयांच्या वतीने संतांसह वैष्णवांचे मोठ्या उत्साही भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी नाश्ता,  चहा, पाणी वाटप करण्यात आले, त्याचबरोबर एवढे अंतर चालून आल्यामुळे त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी कॅम्प सुद्धा लावण्यात आले आहे. वारकऱ्यांना विठुरायाला भेटण्याची जी आस लागली होती ती पूर्ण होणार आहे.

म्हणून वारकरी आनंदी आहे.पंढरपुरात सर्वत्र भक्तिमय वातावरण झाले आहे.भजन, कीर्तन, माऊली  तुकारामाचा जयघोषात पंढरपूर न्हाऊन निघाले आहे.  बुधवारी वाखरी येथे तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम झाला, भाविकांनी तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती, लांबच लांब रांगा दर्शनासाठी लागल्या होत्या. गुरुवारी एक वाजताच्या सुमारास पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली वाटेत वारकऱ्यांनी झिम्मा, फुगड्या, खेळ खेळत होते. वारकऱ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. त्याचबरोबर वारकरी भावुक झाल्याचे दिसुन येत होते. पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. दर्शनासाठी चोवीस तास मंदिर उघडे ठेवण्यात येणार आहे.पंढरपुरात भक्तीचे व उत्साहाचे वातावरण झाले आहे.रस्ते भाविकांनी भरून गेले आहे. 

शहरात चोख पोलीस बंदोबस्त  पंढरपुरात लाखो वारकरी, भाविक आले असल्यामुळे शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त आहे.  पोलीस मदत केंद्र तयार करण्यात आले आहे. वाहतूक पोलीस सर्व येणा?्या गाड्याची तपासणी करून सोडत आहेत. उत्साहाला उधाण  विठुरायाला भेटण्यासाठी राज्यातून त्याचबरोबर परराज्यातून भाविक पंढरपुरात दाखल झाले आहे. शुक्रवारी एकादशी आहे, त्यामुळे पंढरपुरात उत्सवाचे वातावरण झाले आहे. पंढरपूर भक्त्यांच्या उत्साहाने न्हाऊन निघाले आहे . 

- संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज या दोन पालखी सोहळ्यात ८९१ दिंड्या आहेत. उर्वरित प्रमुख पालखी सोहळ्यात मिळून ५०० च्या आसपास दिंड्या आहेत. यातील जास्त दिंड्या व पालखी सोहळे हे सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर व मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील आहेत. कोकण भागातील ही काही दिंड्या आहेत. राज्याबाहेरच शेजारच्या कर्नाटक,मध्यप्रदेश या राज्यातूनही शेकडो दिंड्या पंढरीला येऊन पोहचल्या आहेत.   पंढरपूराला यात्रेचे स्वरूप वारकरी,  भाविक यांच्यामुळे गेल्यामुळे पंढरपूरची बाजारपेठ सजली आहे. हार फुलांचे दुकान, प्रसाद, विविध प्रकारचे पेढे, खेळण्याची दुकाने, यामुळे संपूर्ण अवघी पंढरी सजली आहे. 

टॅग्स :PandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी