शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

पलूस-कडेगाव विधानसभा : देशमुख बंधूंना अर्ज भरण्याचे भाजपाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 4:39 AM

सांगली : भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीने बुधवारी पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख या दोघांनाही पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल होणार असले तरी, निवडणूक लढवायची की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था आहे.कॉँग्रेस ...

सांगली : भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीने बुधवारी पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख या दोघांनाही पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल होणार असले तरी, निवडणूक लढवायची की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था आहे.कॉँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागल्यापासून कॉँग्रेस व भाजपमधील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. कॉँग्रेसच्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणून प्रयत्न चालू ठेवले आहेत. राष्टÑवादीचा सकारात्मक पाठिंबा मिळाला असला तरी, भाजपने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. दरम्यान, बुधवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीने देशमुख बंधूंना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १४ मेपर्यंत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर १३ मे पर्यंत भाजपला निवडणूक लढविण्याबाबतचा अंतिम निर्णय घेता येणार आहे.दबावतंत्राचा भाग म्हणून सध्या भाजपने अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निर्णय कायम राहणार की बदलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळविला आहे. जिल्ह्यातील बैठकीतही हाच निर्णय झाला. आता राज्यस्तरावरील निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.काय होऊ शकतेमाजी आमदार संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर लागलेल्या याच मतदारसंघातील विधानसभेची पोटनिवडणूक डॉ. पतंगराव कदम यांनी लढविली होती. त्यामुळे आता त्यांच्या पश्चात होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपने निवडणूक लढवावी, अशी मागणी होत आहे. कार्यकर्त्यांच्या मागणीप्रमाणे निवडणूक लढविण्याचा निर्णय होऊ शकतो, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे.भाजपाचे टार्गेटमुख्य निवडणूकभाजपामधील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या विधानसभेचा वर्षाचा कालावधी उरला आहे. त्यामुळे वर्षभरात दोनवेळा मतदारसंघात ताकद पणाला लावण्यापेक्षा पुढील वर्षी होणाºया मुख्य निवडणुकीतच ताकद लावण्याची वरिष्ठ नेत्यांची मानसिकता आहे. त्याबाबत त्यांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकाºयांशीही चर्चा केली आहे. स्थानिक पदाधिकाºयांनीही प्रदेशच्या निर्णयाला बांधिल असल्याचे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकSangliसांगलीBJPभाजपा