शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
5
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
6
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
7
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
8
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
9
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
10
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
11
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
12
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
13
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
14
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
15
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
16
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
17
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
18
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
19
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
20
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान

पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 17:40 IST

अलमट्टीची उंची वाढली तरी महाराष्ट्राला त्रास होणार नाही

अतुल आंबीइचलकरंजी : पाकव्याप्त काश्मीरपेक्षा अलीकडे पाकव्याप्त काँग्रेसचा धोका नव्याने तयार झाला आहे. या काँग्रेसवाल्यांची सगळी मानसिकताही पाकिस्तानी लोकांनी हायजॅक केली आहे. जे प्रश्न पाकिस्तानी विचारायला पाहिजेत, ते प्रश्न राहुल गांधी आणि त्यांचे चेले विचारत सुटले आहेत. त्यांच्या डोक्यात पाकिस्तानी व्हायरस घुसला आहे. त्यामुळे त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे, अशी टीका मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी केली.इचलकरंजीतील विकास पर्व सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, भारत देशाची ताकद जगाने पाहिली आहे. २३ मिनिटांत पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले. असे असताना ‘राहुल विचारतो, ड्रोन किती होते? कोण पाडले? कसे पाडले, अशा मूर्खांना कोण सांगणार? शेतीचे औषध फवारणीचे ड्रोन वेगळे आणि युद्धाचे ड्रोन वेगळे असतात असे म्हणत विरोधकांची खिल्ली उडवली.महापुरातील पाणी दुष्काळी भागात नेण्यासाठी १५ दिवसांत निविदा काढणार महापुराचे पाणी दुष्काळी भागात नेण्याच्या पथदर्शी योजनेची निविदा १५ दिवसांत काढणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. त्यामुळे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवली तरी त्याचा धोका पश्चिम महाराष्ट्राला बसणार नाही. तरीही उंची वाढीला आपला विरोध असून, प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.सन २०१९ व २०२१ चा महापूर भयानक होता. त्याची कारणे शोधली असता कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्याने नदी, नाले व ओढे भरून पाणी साचून पूर येतो, हे लक्षात आले. त्यामुळे हे पुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी अतिशय पथदर्शी योजना तयार केली आहे. या योजनेची निविदा १५ दिवसांत काढणार आहे. त्यातून ही समस्या सुटेल. अलमट्टी धरणाची उंची वाढीविरोधात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. प्रसंगी उच्च न्यायालयात धाव घेऊन लढा देऊ; पण आपल्या लोकांवर पुराचं संकट येईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका, अशा सूचना दिल्या आहेत.विकास पर्व सभेस उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, आदी उपस्थित होते.

इचलकरंजीला पिण्याच्या पाण्याची शाश्वत योजना अंमलात आणूशहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नेमका कोणता चांगला आणि कमी विरोधाचा उपाय असू शकेल, हे पाहण्यासाठी आपण एक समिती तयार केली आहे. त्या माध्यमातून शहराला पिण्याच्या पाण्याची शाश्वत योजना लवकरच अंमलात आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच वस्त्रोद्योगासाठी सोलर योजनेतून वीज उपलब्ध करण्याचे नियोजन करू आणि महापालिकेला नवीन कोणत्या माध्यमातून जीएसटी परतावा देता येतो, ते पाहून दोन महिन्यांत त्याचाही निर्णय घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तान