रविवारी एकाच दिवशी १५ रुग्णांची भर पडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या १५ जणांच्या संपर्कातील १२० नागरिकांची त्वरित रॅपिड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आली. सुदैवाने सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या. याशिवाय १४० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापैकी ९० जणांच ...
एन-९५ या ट्रिपल लेअर मास्कची मागणी वाढली. त्यामुळे आता एन-९५ च्या नावाखाली बनावट मास्कचीही विक्री होत आहे. रस्त्यांवर शेंगदाणे-फुटाण्यांची विक्री होते, त्याचप्रमाणे सर्जिकल मास्कची विक्री होऊ लागली आहे. ...
कोरोना संकटामुळे बाजारात मालाला उठावच नसल्याने लिंबाला भाव नसल्याचे चित्र आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागेतील मे महिन्यात तोडणीस आलेले लिंबू माल जुलै महिन्यातही झाडावरच राहिल्याने ते पिवळे होऊन जमिनीवर गळून खाली पडत आहे. बाजारपेठ नसल्याचे सांगत व्यापार ...
वरूड तालुक्यात संत्रा व मोसंबीची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. यावर्षी संत्र्याचा मृग बहर निसर्गाच्या लहरीपणामुळे जमिनीवर आला आहे. यामुळे यंदा मृग बहराची संत्राफळे दुरापास्तच राहतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावस ...
संत्राउत्पादक जिल्ह्याच्या १४ तालुक्यांतील एकूण ५५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सर्वाधिक २० हजार हेक्टर क्षेत्र वरूड तालुक्यात आहे. यापैकी बहुतांश क्षेत्रात मृग बहराचे उत्पादन घेतले जाते. चार वर्षांपासून अपेक्षित उत्पन्नाला मुकलेल्या आणि दुष्काळाने होरपळ ...
सेलू येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वसाहतीच्या इमारतीच्या बांधकामाला २०१३ मध्ये सुरुवात झाली. सात वर्षे पूर्ण होत असतानाही या इमारतीचे बांधकाम अर्धवट आहे. अशातच दोन दिवस आलेल्या पावसाच्या सरी पाहता या इमारतीच्या खिडक्यांवर टाकलेला सज्जा कोसळल्या ...
यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चार महिन्यांपासून मातीच्या मूर्ती तयार केल्यात. २२ ऑगस्टरोजी तीन दिवस अगोदर मूर्ती विक्री साठी उपलब्ध असतात. कोरोनाचा धोका लक्षात घेता संघटनेमार्फत संक्रमणापासून बचावासाठी बाजारपेठेत सूचना फलक लावण्यात येणार असून स ...
वाद सोडविण्यास गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी एका नगरसेवकासह तिघांवर गुन्हा दाखल केला. त्यातील दोघांना अटक करण्यात आली असून एक फरार आहे. ...
रविवारी सायंकाळी पोलिसांनी जेरबंद केलेला गुन्हेगार साहिल ऊर्फ समीर खुर्शीद सय्यद याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी न्यायालयाने दिले. ...
बारावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळाल्यामुळे आनंदात असलेल्या विद्यार्थिनीचा तिच्या घरातच टेबलमध्ये पाय अडकून पडल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे अवघ्या कुटुंबावरच मानसिक आघात झाला आहे. ...