शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आरएसएसचे समांतर शासन उलथून टाका- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 5:39 AM

संविधान टिकवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन; पिंपरीत वंचित बहुजन आघाडीचा मेळावा

पिंपरी : भाजपाच्या आडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात समांतर सरकार चालवत आहे. हे समांतर सरकार रोखण्यासाठी काँग्रेस पाऊल टाकत नाही, त्यामुळे काँग्रेसबरोबरचा समझोता फिस्कटला असे सांगून देशाचे संविधान कायम टिकविण्यासाठी समांतर शासन उलथून टाकण्याचा चंग बांधला आहे. अशी भूमिका बहुजन वंचित आघाडीचे नेते, भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.पिंपरीतील एच ए मैदानावर सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे महाअधिवेशन झाले. यावेळी आंबेडकर बोलत होते. आमदार इम्तीयाज जलील, माजी आमदार लक्ष्मण माने, भारिपचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, अशोक सोनोने, नाथन केंगार, नवनाथ पडळकर आदी उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, मुस्लिम समाजाच्या व्यकतीकडे हत्यारे आढळून आली, तर त्यास दहशतवादी ठरवले जाते. अदिवासींकडे असे काही आढळून आले तर त्यांना नक्षलवादी ठरविण्यात येते. आरएसएस तसेच सनातन संस्थेच्या सदस्यांकडे हत्यारे आढळून आल्यानंतर त्याबद्दल काहीच म्हटले जात नाही. वेगवेगळे मापदंड वापरले जात आहेत.भाजपाच्याआडून आरएसएस, सनातन या संस्थां वेगळी समांतर व्यवस्था उभी करीत आहेत. राज्यघटना बदलण्याचे प्रयत्न होत आहे. ही समांतर व्यवस्था उलथून टाकण्यासाठी काँग्रेसने धोरण स्पष्ट करावे, असे सुचविले. भारिप बहुजन महासंघाने एमआयएमबरोबर जाण्याबाबत काँग्रेसचा आक्षेप होता, समांतर व्यवस्थेच्या विरोधात जाण्यास काँग्रेस तयार नाही. त्यामुळे आम्ही वंचित घटकांना बरोबर घेऊन जाण्याची दिशा निश्चित केली.आरक्षणाने समाजात मनभेद ...एखाद्या समाजाला खूश करण्यासाठी आरक्षणाची खिरापत वाटली जात आहे. आरक्षणाने विद्रोह शमणार नाही. आरक्षणामुळे आपापसात स्पर्धा निर्माण होऊन मनभेद होणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून विशिष्ट घरण्यांची सत्ता पहावयास मिळत आहे. मराठा समाजाला सत्तेवर संधी मिळाली, असे नव्हे तर मराठी समाजातील काही कुटूंबांनी सत्ता उपभोगली आहे. लोकशाहीत कुटुंबशाही नको, नात्यागोत्याची सत्ता आता पुरे झाली. व्देषाचे राजकारण न करता, वंचित घटकाच्या विकासाचे, सर्वसमावेशक विकासाचे राजकारण होणेगरजेचे आहे.सरकारची धोरणे चुकीची...शिक्षणाचा खर्च सरकारने करणे अपेक्षित आहे. आपल्या येथे बँकेचे कर्ज घेऊन कुटुंबीय मुलांना शिक्षण देतात. हा खर्च कुटूंबाने केला असल्याने, तो खर्च वसूल करण्याची त्यांची मानसिकता असते. कर्ज काढून शिक्षण घेऊन डॉक्टर झालेले, अभियंता झालेले तरूण मानवतेच्यादृष्टीने विचार करीत नाही. सरकारच्या अशा चुकीच्या धोरणामुळे मानवतेचा बळी घेणारे लुटारू तयार होत आहेत. औरंगाबादचे एमआयमचे आमदार इम्तियाज जलील म्हणाले, अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांना आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात पाहतो.वंचित बहुजन आघाडी स्थापण्यामागे केवळ सत्ता मिळविणे हा उद्देश नाही, तर देशाच्या संविधानाचे रक्षण करणे हा मुख्य हेतू आहे. दरम्यान मार्गदर्शक तत्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे आगामी काळात वंचित बहुजन आघाडी सत्तेवर आल्यास राज्य घटनेतील मार्गदर्शक तत्वांचे रूपांतर मुलभूत अधिकारांमध्ये करण्यात येईल.असा ठराव पिंपरी येथे झालेल्या अधिवेशनात संमत करण्यात आला.कुपोषणाची आकडेवारी पुढे येत नाहीपुणे जिल्हा हा सत्तेचे माहेरघर मानला जातो. जाणता राजाचे वास्तव्य असलेला हा जिल्हा आहे. मावळ आणि आंबेगाव भागात आदिवासींचे वास्तव्य आहे. नंदूरबार, मेळघाट, गडचिरोली येथील आदिवासी बालकांच्या कुपोषणाची आकडेवारी जाहीर केली जाते. परंतू जाणता राजा असलेल्या भागातील आदिवासींच्या कुपोषणाची आकडेवारी कधी पुढे येऊ दिली जात नाही. जाणत्या राजाला कुपोषणाची जाणीव नाही. अशी टिप्पणी अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांचे नाव न घेता केली. तसेच, एचएची जागा लाटण्याचा राष्ट्रवादी नेत्यांचा डाव होता, त्यामुळेच ‘एचए’चे पुनरूज्जीवन अद्याप होऊ शकले नाही. असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ