शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
6
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
7
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
8
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
9
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
10
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
11
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
12
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
13
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
14
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
15
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
16
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
17
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
18
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
19
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
20
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थक्षेत्रांना नियमबाह्य २०० कोटी

By admin | Updated: April 1, 2015 02:07 IST

पोलीस अधीक्षकांचे प्रमाणपत्र नसतानाही राज्यात ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षांत तब्बल २०० कोटी रुपयांचे नियमबाह्ण वाटप करण्यात आले

राजेश निस्ताने, यवतमाळपोलीस अधीक्षकांचे प्रमाणपत्र नसतानाही राज्यात ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षांत तब्बल २०० कोटी रुपयांचे नियमबाह्ण वाटप करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे आघाडी सरकारमध्ये राजकीय सोयीने वाटप झाल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. महाराष्ट्रातील भाविकांना तीर्थक्षेत्रावर आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सन २०१२ पासून तीर्थक्षेत्र विकास योजना सुरू केली. १६ नोव्हेंबर २०१२ रोजी त्याबाबतचा आदेश जारी केला. अ, ब आणि क अशी तीर्थक्षेत्रांची वर्गवारी करण्यात आली. त्यासाठी नियमित व उत्सव काळातील भाविकांची संख्या किती, हा निकष ठेवण्यात आला. भाविक संख्येचे प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी जिल्हा पोलीस अधीक्षकांवर सोपविण्यात आली. या प्रमाणपत्राशिवाय निधीचे वाटप करू नये, असेही बंधन आहे. मात्र राज्यात आघाडी सरकारने ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा निधी वाटप करताना पोलीस प्रमाणपत्राला किंमत दिली नाही. हे प्रमाणपत्र नसताना प्रत्येक जिल्ह्णात ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राला दरवर्षी दोन कोटी रुपये निधी जिल्हा नियोजन समितीतून वितरित करण्यात आले. गेल्या तीन वर्षात पोलीस प्रमाणपत्राशिवाय राज्यातील ३३ जिल्ह्णांमध्ये सुमारे २०० कोटींपेक्षा अधिक निधीचे वाटप करण्यात आले. अमरावती येथील द फोनिक्स असोसिएशनचे अध्यक्ष राजदीप देवीदास खंडार यांना ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या प्रधान सचिवांना कडून ही माहिती मिळाली. खंडार यांच्याकडे आतापर्यंत अमरावती, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, जळगाव, लातूर, उस्मानाबाद, जालना, अकोला, नाशिक, सोलापूर आदी जिल्ह्णांची माहिती प्राप्त झाली आहे.