शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायास कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
3
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
4
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
5
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
6
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
7
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
8
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
9
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
10
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
11
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
12
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
13
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
14
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
15
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
16
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
17
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
18
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
19
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
20
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?

४१ पैकी एकट्या ३ मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ३२० कोटी ६४ लाखांची मुद्रांक माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:58 IST

शासनाने राबवलेल्या मुद्रांक शुल्क अभय योजनांतर्गत लाखोंची मुद्रांक व दंड माफी केल्याची माहिती अधिकारात समोर आले.

शासनाने राबवलेल्या मुद्रांक शुल्क अभय योजनामध्ये राज्यातील ४१ मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयांपैकी ठाणे शहर, बोरिवली व अंधेरी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यक्षेत्रात १०० टक्के मुद्रांक व शास्ती माफी अनुषंगाने तब्बल  ३२० कोटी ६४ लाखांची मुद्रांक व दंड माफी केल्याचे माहिती अधिकारात समोर आले. अन्य ३८ कार्यालयांची माहिती दिली जात नसली तरी कर बुडव्यांना काही हजार कोटींची माफी दिली गेली.

मीरा भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणात अनोंदणीकृत करारनाम्यांच्या आधारे कायद्याचे उल्लंघन करून व शासनाचे मुद्रांक शुल्क बुडवून झालेल्या व्यवहारांच्या तक्रारी ग्रामस्थ अमोल रकवी यांनी शासनाकडे सातत्याने चालवल्या होत्या. एकट्या मीरा भाईंदरमध्ये शासनाला कोट्यावधी रुपयांचा चुना लावला गेला असून शेतकरी, जमीन मालक यांना जमिनीचा मोबदला नाममात्र द्यायचा आणि अनोंदणीकृत कुलमुखत्यारद्वारे त्याच जमिनी अन्यत्र विक्री, हस्तांतरित केल्या गेल्या. जमिनीची कायदेशीर मालकी नसताना देखील महापालिकेने विकासकांना बांधकाम परवानगी दिल्याच्या तक्रारी रकवी यांनी पुराव्यांसह केल्या आहेत. 

दरम्यान शासनाने  डिसेम्बर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यान मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ दोन टप्प्यात अमलात आणली. त्यात  १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेम्बर २००० काळातील प्रलंबित मुद्रांक शुल्क आणि त्यावर आकारलेला दंड असे पूर्णपणे १०० टक्के माफ करण्यात आला. रकवी यांनी मुद्रांक शुल्क व दंड माफीची माहिती राज्याच्या मुद्रांक निरीक्षक यांच्याकडे मागितली होती. 

राज्यातील ४१ पैकी केवळ ३ मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाने अभय योजनेतील १०० टक्के शुल्क व दंड माफ केलेल्या प्रकरणाची माहिती रकवी यांना दिली आहे. ठाणे शहर मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात अभय योजनेच्या १०० टक्के माफीसाठीचे २ हजार ६९३ अर्ज आले. त्यानुसार १२ कोटी ५१ लाख २५ हजार ६५० मुद्रांक शुल्क माफी तर  १२ कोटी ५१ लाख २५ हजार ६४८ रुपये इतका दंड असे एकूण २५ कोटी २ लाख ५१ हजार २९८ रुपये माफ केले गेले. 

मुद्रांक जिल्हाधिकारी बोरिवली कार्यालयात १०० टक्के माफीचे ५ हजार २०९ अर्ज आले. त्यानुसार ३४ कोटी ८९ लाख १० हजार ५८४ मुद्रांक शुल्क माफी तर १३९ कोटी ५६ लाख ४२ हजार ३३६ रुपये इतकी दंड माफी असे एकूण तब्बल १७४ कोटी ४५ लाख ५२ हजार ९२० रुपये माफ केले गेले. अंधेरी तालुका कार्यालयकडे १०० टक्के माफीचे ६ हजार ६२३ अर्ज आले.  त्याची मुद्रांक माफी २५ कोटी २४ लाख २२ हजार ४००  रुपये तर ९५ कोटी ९२ लाख ५ हजार १२० इतका दंड असे एकूण एकूण १२१ कोटी १६ लाख २७ हजार २५० रुपये माफ केले गेले. 

राज्यावर कर्जाचा डोंगर असताना आणि सामान्य नागरिकांवर महागाई व कराचे ओझे असताना मुद्रांक शुल्क बुडवणाऱ्याना काही हजार कोटी रुपयांची माफी हा सामान्य करदात्या नागरिकांवर अन्याय असल्याचे अमोल रकवी म्हणाले. १०० टक्के मुद्रांक शुल्क व दंड माफीची केवळ ३ कार्यालयांची माफीची आकडेवारी ३२० कोटी पेक्षा जास्त आहे. त्यामुळे राज्यातील अन्य ३८ जिल्हाधिकारी कार्यक्षेत्रातील १०० टक्के माफीची आकडेवारी काही हजार कोटीत असण्याची शक्यता आहे. याशिवाय, शासनाने १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेम्बर २०२० या २० वर्षांच्या काळातील मुद्रांक शुल्क बुडव्यांसाठी १० ते २५ टक्के मुद्रांक माफी आणि तब्बल ८० ते ९० टक्के दंडाच्या रकमेत माफी दिलेली आहे. ही भरघोस माफीची आकडेवारी देखील काही हजार कोटींच्या घरात असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रthaneठाणे