शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 05:24 IST

कुणाचं लग्न उरकलं, कुणाचं लग्न ठरलं... सुट्टीवर आलेल्या जवानांचे अचानक फोन खणाणले, ‘कर्तव्यावर हजर व्हा’ असे आदेश मिळाले अन् मेहंदीचे हात बंदुका पेलण्यासाठी सज्ज झाले...

- सोमनाथ खताळलोकमत न्यूज नेटवर्क बीड : ३ मे रोजी बीडमधील एका हॉटेलात साक्षगंध कार्यक्रम झाला. मुलगी तिच्या गावी गेली. सुट्ट्याही आणखी काही दिवस बाकी होत्या. असे असतानाच भारत-पाकिस्तान युद्धाची बातमी समजली. मध्यरात्रीच कॉल आला आणि बीडचा करण सूर्यकांत महाजन हा देशसेवेसाठी रवाना झाला. हवाई दलात तो फ्लाइंग ऑफिसर म्हणून कर्तव्य बजावत आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.

बीडमधील सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत महाजन यांचा मुलगा करण याने आयआयटीमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण केले. आपणही भारतीय सैन्य दलात काही करून दाखविले पाहिजे, अशी आवड त्याच्या मनात निर्माण झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर होणाऱ्या सेंट्रल डिफेन्स सर्व्हिस (सीडीएस) या परीक्षेची २०१६ पासून करणने तयारी सुरू केली. 

लग्नाच्या तारखेवर चर्चाडिसेंबर २०१७ मध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून त्याची निवड झाली. तो सहा महिन्यांतून १ महिना सुट्टीवर गावी येत असे. आताही तो १४ एप्रिलला सुट्टीवर आला होता.त्याचे हाॅटेल मॅनेजमेंट करणाऱ्या महेक नेब ( भिलाई, छत्तीसगड) हिच्याशी ३ मे रोजी बीडमधील एका हॉटेलमध्ये साक्षगंध झाले. लग्नाची तारीख ठरविण्याची चर्चा सुरू असतानाच मध्यरात्रीच करणला कॉल आला. कसलाही विचार न करता पहिल्या विमानाने तो रवाना झाला. 

नवरदेवाचा पोषाख काढला; वर्दीला वंदन करून निघाला

वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वेचे सुपुत्र कृष्णा राजू अंभोरे यांनी देशप्रेम आणि कर्तव्यनिष्ठेचे एक आदर्श आणि प्रेरणादायी उदाहरण सादर केले आहे. लग्न होऊन आठवडा उलटत नाही तोच सैन्यदलाकडून आलेली तातडीने हजर राहण्याची सूचना त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वीकारली आणि साक्षात गणवेशाला वंदन करत सीमेकडे प्रयाण केले. 

कृष्णा अंभोरे यांचे लग्न दि. २ मे रोजी पार पडले. संसाराच्या नव्या प्रवासाची सुरुवात होत असतानाच, सैन्यदलाकडून त्यांना तातडीने हजर होण्याची सूचना मिळाली. लग्नाच्या अवघ्या सात दिवसांतच अंगावर गणवेश चढवून देशरक्षणासाठी सीमेवर जाण्याची वेळ आली. त्यांनी आनंदाने हा आदेश स्वीकारला आणि दि. ९ मे रोजी शुक्रवारी कर्तव्यावर रुजू होण्यासाठी रवाना झाले. कृष्णा घरातून निघताना त्यांच्या डोळ्यांत अभिमान आणि आत्मिक शांतता होती. मात्र, त्यांच्या पत्नीच्या डोळ्यांतून अश्रूंचा ओघ थांबत नव्हता. त्या अश्रूंमध्ये नवरा देशसेवेसाठी निघाल्याचा अभिमान होता. सैनिकी ड्युटी, विशेषतः सीमावर्ती भागात, ही केवळ नोकरी नाही, ती एक जबाबदारी आहे, एक संकल्प आहे.

देशसेवेला दिले प्राधान्य कृष्णाने आपल्या संकल्पासाठी वैयक्तिक सुख, नवा संसार आणि कुटुंबाचा विचार बाजूला ठेवून देशसेवेला प्राधान्य दिले.त्यांचा हा निर्णय आजच्या तरुण पिढीसाठी एक प्रेरणादायी संदेश ठरत आहे. कृष्णा अंभोरे यांच्या निर्णयामुळे वाशिम जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली.

ग्रामस्थांचे डोळे पाणावलेकृष्णा देशसेवेसाठी निघाले, तेव्हा गावातील वातावरण भावनिक झाले होते. त्यांना निरोप देण्यासाठी गावकऱ्यांनी वाशिम रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. ‘जय जवान’, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ या घोषणांनी संपूर्ण रेल्वेस्थानक परिसर दणाणून गेला होता. गावातील आबालवृद्धांनी त्यांना सॅल्युट करत अभिमानाने निरोप दिला.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान