शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

गरिबांच्या गृहनिर्माणात केवळ आकड्यांचेच इमले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 03:15 IST

वाटचाल बिकट; योजना व्यवहार्य ठरत नसल्याने सरकारी यंत्रणा निष्क्रिय, कर्ज संलग्न व्याज अनुदानाचा घेतलेला फायदा हेच जुजबी यश

- संदीप शिंदे मुंबई : मुंबई उपनगरांमध्ये ४ लाख ६२ हजार, ठाण्यात ६२,७४०, मीरा-भार्इंदर येथे २५,३४०, वसई-विरारला ५६,२८९, अशा प्रकारे राज्यातल्या प्रत्येक शहराला पंतप्रधान आवास योजनेतून गृहनिर्मितीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. मात्र, यापैकी कोणत्याही शहरांत योजनेतील एकाही घराची वीट रचता आलेली नाही. झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचे प्रयत्नही यशस्वी होत नाहीत. कर्ज संलग्न व्याज अनुदानाचा घेतलेला फायदा हाच या योजनेचे जुजबी यश म्हणता येईल.ठाणे पालिकेने पंतप्रधान आवास योजनेतून गृहनिर्माणासाठी चार ठिकाणांच्या जागा निश्चित केल्या. त्यापैकी दोन जागा हस्तांतरणाच प्रस्ताव सरकार दरबारी धूळखात आहे. उर्वरित दोन ठिकाणी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रियाच सुरू झालेली नाही. हरित क्षेत्रात गृहनिर्माणासाठी एका विकासकाने पाठविलेला प्रस्तावही मंजुरीच्याच प्रतीक्षेत आहे. या योजनेतून गृहनिर्माण शक्य नसल्याचे सांगत युपीए सरकारच्या काळातील बीएसयूपी योजनेतील अतिरिक्त तीन हजार घरे नव्या योजनेच्या नावाखाली वितरित करण्याची परवानगी मागितली आहे. मीरा-भार्इंदर पालिकेने ५९ हजार घरे उभारणीचा आराखडा तयार केला.१३ विकासकांचे प्रस्तावही आले. मात्र, त्यांनाही मंजुरी मिळाली नाही. सिडकोने नवी मुंबईत या योजनेतील ९० हजार घरे उभारणीची घोषणा केली. मात्र, स्थानिकांच्या विरोधामुळे त्यात विघ्न आले, तरीही येथे काही घरांचे काम प्रगतिपथावर आहे. नवी मुंबई वगळता राज्यातल्या बहुतांश शहरांची या योजनेची वाटचाल बिकट आहे. शहरी भागांत या योजनेच्या अटी-शर्थींवर गृहनिर्माण व्यवहार्य ठरणार नाही, असेच बहुसंख्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नुसते कागदी घोडे नाचविण्यापलीकडे योजना पुढे सरकताना दिसत नाही.चारपैकी तीन घटक अपयशीयोजनेची अंमलबजावणी चार स्वतंत्र घटकांत प्रस्तावित आहे. झोपडपट्टी पुनर्विकासातून २ लाख १८ हजार घरांची उभारणी अपेक्षित असली, तरी एकही घर उभे राहिले नाही. खासगी विकासकांना प्रकल्पांसाठी प्रोत्साहित करणाºया दुसºया घटकात साडेसात लाख घरांच्या उभारणीचे लक्ष्य आहे.एखाद-दोन ठिकाणीच प्रकल्प सुरू आहे. त्यातूनही अपेक्षित घरांची उभारणी झाली नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लोकांना वैयक्तिकपातळीवर घरकूल बांधण्यासाठी अनुदान देण्याच्या तिसºया घटकांन्वये २ लाख १८ हजार घरांचे बांधकाम अपेक्षित आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १४ एप्रिल, २०१७ रोजी कोकण, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, नागपूर येथे ४२ हजार घरांच्या उभारणीचे भूमिपूजन झाले. त्यापैकी बहुसंख्य घरे उभारली आहेत.चौथा घटक कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या (सीएलएसएस) माध्यमातून परवडणाºया घरांसाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे. त्यात १ लाख ८४ हजार लाभार्थ्यांनी अर्ज केले. बहुसंख्य अर्जदारांना कर्ज उपलब्ध झाल्याचे सांगितले जाते. मात्र, अधिकृत आकडा उपलब्ध नाही.एमएमआरमधील प्रमुख शहरांना दिलेले गृहनिर्माणाचे उद्दिष्टमुंबई उपनगर - ४,७६,२८१ठाणे - ६२,७४०कल्याण-डोंबिवली - ५२,४२२नवी मुंबई - ४४ ,१७३मीरा-भार्इंदर - २५,३४०उल्हासनगर - २२,६३२भिवंडी - ३४,४१८वसई-विरार - ५६,२७९