शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

महाराष्ट्राची स्थिती बिघडली असताना मराठी साहित्यिक गप्प का ? - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 5:36 PM

गायकांचे राग वेगळे आणि आमचे राग वेगळे, त्यांचे राग ऐकू वाटतात, पण आमचे राग परवडत नाहीत, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.

सांगली : मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणून आता चर्चा होत आहेत. मात्र मराठी भाषेअगोदर मराठी माणूस टिकला पाहिजे. जर आजची परिस्थिती निघून गेली, तर पश्चाताप करण्याशिवाय काहीही राहणार नाही, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी औदुंबर (जि. सांगली) येथे व्यक्त केले. औदुंबर साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते.ते म्हणाले की, क-हाडमध्ये १९७५मध्ये झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दुर्गाताई भागवत होत्या. त्यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तरीही दुर्गाताई भागवतांनी आणीबाणीवर सडेतोड टीका केली. परिस्थिती काहीही असली तरी, तुमची भूमिका महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच्या सध्याच्या बिघडलेल्या परिस्थितीबाबत साहित्यिक कोणतीही भूमिका मांडताना दिसत नाहीत. महाराष्ट्राचे भले करायचे असेल, तर अगोदर या राजकारणाच्या आणि जातीपातीच्या भिंती पाडायला हव्यात.केवळ एक दिवस साहित्यिकांचा सन्मान करायचा, पण त्यांचे साहित्य आपण वाचणार नसू, तर साहित्य संमेलने भरवून काही फायदा आहे का? इतर राज्यात त्यांच्या भाषांप्रती असलेली आस्था महाराष्ट्रात दिसत नाही. दक्षिणेतील तीन भाषांना अभिजात दर्जा मिळाला, पण मराठीला अद्याप तो मिळाला नाही. कदाचित गुजरात भाषेला अर्ज न करताही हा दर्जा मिळू शकतो. पंतप्रधान हा देशासाठी असावा. जर पंतप्रधानांना गुजरातचा आदर असेल, तर मी महाराष्ट्राचा आदर केला तर काय बिघडले? मी माझी भूमिका घेऊनच काम करणार.सद्भावना मनापासून असावी लागते!राज ठाकरे यांनी सांगलीतील सद्भावना रॅलीचाही समाचार यावेळी घेतला. ते म्हणाले, सांगलीत म्हणे सद्भावना रॅली काढली गेली. अशा रॅल्या काढून सद्भावना निर्माण होत नसते, तर त्यासाठी सद्भावना मनातून निर्माण व्हावी लागते. संयोजकांनी मला त्यात सहभागी होण्याची विनंती केली. मी त्यांना लगेच सांगितले, माझा सहभाग तुम्हाला पेलणार नाही.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSangliसांगलीmarathiमराठी