शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दुष्काळाच्या बैठकीला फक्त भाजपाचेच लोकप्रतिनिधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 1:49 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा टंचाई आढावा बैठकीला भाजपा वगळता, इतर पक्षांच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रणच नसल्याने ‘ही भाजपाची बैठक’ होती का, असा सवाल शिवसेनेसह इतर पक्षाच्या आमदारांनी केला आहे.

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा टंचाई आढावा बैठकीला भाजपा वगळता, इतर पक्षांच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रणच नसल्याने ‘ही भाजपाची बैठक’ होती का, असा सवाल शिवसेनेसह इतर पक्षाच्या आमदारांनी केला आहे.दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घाईघाईने आढावा बैठक आयोजित केली. ९ आॅक्टोबरच्या रात्री १० वाजेपर्यंत बैठकीची कुणालाही माहिती नव्हती. मात्र, भाजपाच्या गोटात या बैठकीची माहिती पूर्वीपासूनच होती. त्यामुळे भाजपाचे आ. प्रशांत बंब, आ. अतुल सावे व एमआयएमचे आ. इम्तियाज जलील हे बैठकीला हजर होते. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना बोलावण्याची गरज त्यांना वाटली नसावी, असा टोला शिवसेना आ.संजय शिरसाट यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेणे गरजेचे होते, असे राष्ट्रवादीचे आ.भाऊसाहेब चिकटगावर म्हणाले. संवेदनशील मुद्द्यावर नोकरशाहीच्या जिवावर बैठक घेऊन निर्णय होतात. अधिकाऱ्यांच्या फिडबॅकवर जर मुख्यमंत्री निर्णय घेणार असतील, तर हे राज्याचे दुर्दैव आहे, असेआ. सतीश चव्हाण म्हणाले. बैठकीला खासदार म्हणून निमंत्रण नव्हते. पालकमंत्री आल्याने जावे लागले. बैठकीत भाजपाचे लोकप्रतिनिधी लोढणे म्हणून शिरले, असा आरोप खा.चंद्रकांत खैरे यांनी केला.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र