शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन लिलाव पद्धत पाडली बंद, शेतमालाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 22:58 IST

राज्य शासनाने मागील काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आॅनलाइन लिलाव पद्धतीद्वारे शेतमाल विक्री सुरू केली आहे.

वरोरा (चंद्रपूर) : राज्य शासनाने मागील काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आॅनलाइन लिलाव पद्धतीद्वारे शेतमाल विक्री सुरू केली आहे. मात्र, या पद्धतीत प्रत्येक क्विंटल मागे प्रचंड तफावत येत असल्याचे शेतक-यांच्या निदर्शनात आल्याने शेतक-यांनी वरोरा येथील बाजार समितीमधील ही पद्धत शुक्रवारी बंद पाडली.लिलाव पद्धत बंद पाडून बोली पद्धतीने शेतमाल घेण्यास व्यापा-यांना भाग पाडल्याने प्रती क्विंटल ४०० रुपयांपर्यंतचा अधिक भाव शेतक-यांना मिळाला. राष्ट्रीय कृषी बाजार समिती ईनाम योजनेंतर्गत राज्यातील प्रत्येक बाजार समितीमध्ये व्यापारी आपली बोली आॅनलाइन पद्धतीने बोलून दर ठरवित होते. त्यानंतर शेतमाल खरेदी करीत होते. मात्र, शेतमाल खरेदी करताना आपल्या मालाला व्यापारी कुठपर्यंत दर देत आहेत याची कल्पना शेतक-यांना पावती आल्यानंतरच येत होती.शुक्रवारी वरोरा बाजार समितीत आॅनलाइन लिलावात तुरीला ४ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल तर सोयाबीनला ३ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याचे शेतक-यांच्या लक्षात आले. हा भाव कमी असल्याने शेतकरी संतप्त झाले व आॅनलाइन लिलावाला कडाडून विरोध केला. जुन्याच पद्धतीने बोली बोलून शेतमाल खरेदी करण्याचा आग्रह केला. अखेर बाजार समिती प्रशासनाने याची दखल घेत खुल्या बोलीने व्यापा-यांनी शेतमाल घ्यावा, असे निर्देश दिले. या बोलीत शेतक-यांना तूर व सोयाबीनवर प्रति क्विंटल २०० रुपये अधिक दर मिळाला.सोमवारपासून बाजार समिती मार्केट बंदराष्ट्रीय कृषी बाजार समिती ईनाम योजनेतंर्गत ई-लिलाव पद्धतीने वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रक्रिया सुरू केली. परंतु आॅनलाइन लिलाव प्रक्रियेमध्ये शेतक-यांना भाव कमी मिळत असल्याने सदर प्रक्रिया शेतक-यांना बंद पाडून बोलीप्रमाणे शेतमाल विकला. आॅनलाईन लिलाव पद्धतीबाबत शासनाच्या वरिष्ठ अधिका-यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांचे पुढील निर्देश येतपर्यंत सोमवारपासून वरोरा बाजार समितीचे मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चंद्रशेन शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.व्यापा-यांकडून शेतक-यांची लूटआॅनलाइन लिलाव पद्धतीने शेतमाल खरेदीची योजना चांगली आहे. मात्र, यात व्यापा-यांनी साखळी तयार करून शेतक-यांची लूट सुरू केली आहे. त्यामुळे व्यापारी संख्या वाढविणे गरजेचे झाले आहे. बाजार समितीतील व्यापा-यांच्या अशा मिलीभगतमुळे वरोरा बाजारपेठेवर पुन्हा मंदीचे सावट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आॅनलाइन पद्धतीने लिलावात भाव कमी मिळाला. त्यामुळे ही पद्धत आम्ही बंद पाडली. जुन्या बोली पद्धतीने शेतमाल खरेदी करण्यास व्यापा-यांना भाग पाडले. त्यामुळे प्रति क्विंटल मागे भाववाढ मिळाली.- मनोज पुनवटकर, शेतकरी, आबमक्ता