शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

Maharashtra CM: महाराष्ट्रच नाही, भाजपासाठी चार राज्यांमध्ये राज्यपाल बनले गेमचेंजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 10:41 IST

गेल्या तीन वर्षांत देशभरातील चार राज्यांमध्ये निवडणुकांनंतर राज्यपालांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपाने या राज्यांमध्ये बहुमत नसतानाही सत्ता स्थापन केली होती. 

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर कोणताही पक्ष सत्ता स्थापन न करू शकल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट लागू केली होती. मात्र, शनिवारी धक्का देत राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली. यानंतर लगेचच भाजपाचेदेवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या तीन वर्षांत देशभरातील चार राज्यांमध्ये निवडणुकांनंतर राज्यपालांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपाने या राज्यांमध्ये बहुमत नसतानाही सत्ता स्थापन केली होती. 

मणिपूरमध्ये 2017 मध्ये 60 सदस्यांच्या विधानसभेची निवडणूक झाली होती. यावेळी काँग्रेसचे 28 आमदार जिंकले होते. तर भाजपाचे 21 आमदार निवडून आले होते. राज्यपालांनी निवडणुकीनंतर युतीला आधार बनवून भाजपाला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. यानंतर तेथे भाजपाचे सरकार बनले होते. 

गोव्यामध्येही 2017 मध्ये निवडणूक झाली होती. यावेळी काँग्रेस 18 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी भाजपाला सरकार बनविण्याचे निमंत्रण दिले होते. काँग्रेस याविरोधात सर्वोच्च न्यायालयात मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापासून रोखण्याची मागणी केली होती. न्यायालयाने शपथ रोखली नाही मात्र 16 मार्चला सकाळी 11 वाजता पर्रिकरांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. राज्यपालांच्या या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. 

मेघालयमध्ये 2018 मध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. यामध्ये 21 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र येथेही राज्यपालांनी भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षाला सत्तास्थापनेसाठी बोलावले होते. भाजपाकडे केवळ 2 जागा होत्या आणि त्यांच्या सहकारी पक्ष नॅशनल पिपल्स पार्टीकडे 19 जागा होत्या. 

कर्नाटकचा पुढील अंक आज महाराष्ट्रात घडत आहे. कर्नाटकमध्ये 2018 मध्ये राज्यपाल विजुभाई वाला यांनी सर्वात मोठा पक्ष भाजपाला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते येडीयुराप्पा यांनी शपथही घेतली होती. मात्र, बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. त्यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर काँग्रेस जेडीएसची सत्ता आली. मात्र, भाजपाने पुन्हा त्यांचे 17 आमदार फोडत सत्ता स्थापन केली. आज या जागांवर पोटनिवडणूक होत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपा