शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Maharashtra CM: महाराष्ट्रच नाही, भाजपासाठी चार राज्यांमध्ये राज्यपाल बनले गेमचेंजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 10:41 IST

गेल्या तीन वर्षांत देशभरातील चार राज्यांमध्ये निवडणुकांनंतर राज्यपालांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपाने या राज्यांमध्ये बहुमत नसतानाही सत्ता स्थापन केली होती. 

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर कोणताही पक्ष सत्ता स्थापन न करू शकल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट लागू केली होती. मात्र, शनिवारी धक्का देत राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली. यानंतर लगेचच भाजपाचेदेवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या तीन वर्षांत देशभरातील चार राज्यांमध्ये निवडणुकांनंतर राज्यपालांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपाने या राज्यांमध्ये बहुमत नसतानाही सत्ता स्थापन केली होती. 

मणिपूरमध्ये 2017 मध्ये 60 सदस्यांच्या विधानसभेची निवडणूक झाली होती. यावेळी काँग्रेसचे 28 आमदार जिंकले होते. तर भाजपाचे 21 आमदार निवडून आले होते. राज्यपालांनी निवडणुकीनंतर युतीला आधार बनवून भाजपाला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. यानंतर तेथे भाजपाचे सरकार बनले होते. 

गोव्यामध्येही 2017 मध्ये निवडणूक झाली होती. यावेळी काँग्रेस 18 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी भाजपाला सरकार बनविण्याचे निमंत्रण दिले होते. काँग्रेस याविरोधात सर्वोच्च न्यायालयात मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापासून रोखण्याची मागणी केली होती. न्यायालयाने शपथ रोखली नाही मात्र 16 मार्चला सकाळी 11 वाजता पर्रिकरांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. राज्यपालांच्या या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. 

मेघालयमध्ये 2018 मध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. यामध्ये 21 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र येथेही राज्यपालांनी भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षाला सत्तास्थापनेसाठी बोलावले होते. भाजपाकडे केवळ 2 जागा होत्या आणि त्यांच्या सहकारी पक्ष नॅशनल पिपल्स पार्टीकडे 19 जागा होत्या. 

कर्नाटकचा पुढील अंक आज महाराष्ट्रात घडत आहे. कर्नाटकमध्ये 2018 मध्ये राज्यपाल विजुभाई वाला यांनी सर्वात मोठा पक्ष भाजपाला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते येडीयुराप्पा यांनी शपथही घेतली होती. मात्र, बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. त्यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर काँग्रेस जेडीएसची सत्ता आली. मात्र, भाजपाने पुन्हा त्यांचे 17 आमदार फोडत सत्ता स्थापन केली. आज या जागांवर पोटनिवडणूक होत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपा