शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या हिंसेचा मुकाबला अहिंसेने करणार -  अशोक चव्हाण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 19:54 IST

निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाकडून जातीय विद्वेष पसवरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काँग्रेस पक्ष भाजपाच्या हिंसेंचा मुकाबला अहिंसेने करेल आणि  सामाजिक शांतता, सलोखा व बंधुत्वाची भावना कायम राखण्याची जबाबदारी पार पाडेल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.

मुंबई : निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाकडून जातीय विद्वेष पसवरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काँग्रेस पक्ष भाजपाच्या हिंसेंचा मुकाबला अहिंसेने करेल आणि  सामाजिक शांतता, सलोखा व बंधुत्वाची भावना कायम राखण्याची जबाबदारी पार पाडेल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.

भाजपा सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील व राज्यातील सामाजिक शांतता धोक्यात आली आहे. समाजात शांतता, सलोखा, बंधुत्वाची भावना कायम राखण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एक दिवसाचा लाक्षणिक उपवास करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली परभणी येथे मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज उपवास केला. तत्पूर्वी सकाळी पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले जवान शुभम मस्तापुरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

परभणी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खा. चव्हाण यांनी भाजप सरकारच्या जातियवादी भूमिकेवर जोरदार टीका केली. भाजप देशभरात द्वेष पसरविण्याचे काम करित आहे. भाजपाशासित राज्यांमध्ये दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात आहेत. जातीय दंगलींमध्ये भाजपा आणि संघाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे सिद्ध झाले आहे. पण, दुर्देवाने त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही.  भीमा कोरेगाव सारख्या घटना घडवून मराठा आणि दलित समाजात फूट पाडण्याचे काम राजकीय स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षाकडून केले जात आहे. देशातील एकूण परिस्थिती चिंताजनक झाली असून दलित, अल्पसंख्यांक, आदिवासींच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशा परिस्थितीत सामाजिक एकोपा जपून बंधुत्वाची भावना वाढवण्याची मोठी जबाबदारी काँग्रेस कार्यकर्त्यांवर आहे.  भाजपा देश तोडण्याचे काम करित आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोडण्याचे काम करावे. भाजपाला राज्याच्या आणि देशाच्या विकासाची चिंता नसून निवडणुका जिंकण्याची जास्त चिंता आहे. सामाजिक शांतता, सलोखा आणि बंधुत्वाची भावना राहिल्याशिवाय कुठल्याही राज्याचा देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. भाजपच्या सत्ताकाळात हे शक्य नाही त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिवर्तनासाठी सज्ज व्हावे असे खा. चव्हाण म्हणाले.

देशाचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री वसंत पुरके, शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ येथे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे, आ. मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद येथे, आ. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे, आ. अमर राजूरकर, आ. अमिता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे,  आ. शरद रणपिसे, आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे, आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर येथे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस यांच्या नेतृत्वाखाली वर्धा येथे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली ठाणे येथे व राज्यातील इतर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत उपवास करून भाजप सरकारच्या जातियवादी भूमिकेचा निषेध केला. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMaharashtraमहाराष्ट्र