शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

ना चित्रपटांची नावे, ना नेत्यांची, त्याने आपल्या रिक्षावर लिहिलं ‘चांद्रयान-२’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 10:41 AM

शास्त्रज्ञांचा अभिमान : यानाशी संपर्क होण्याची अशोक नागभुजंगे यांना आशा

ठळक मुद्देगगनयान ही भारताची एक अंतराळ मोहीमया मोहिमेद्वारे भारतीय अंतराळवीर अवकाशात राहणार सोलापूरकरांना चांद्रयान-२ या मोहिमेविषयी आकर्षण

सोलापूर : अनेकदा शहरातील रिक्षांवर लिहिलेला मजकूर आपले लक्ष वेधून घेत असतो. शेरोशायरी, चित्रपटांची नावे, अण्णा-दादांची नावे, फॅन आॅफ दी, अभिनेत्यांची नावे देखील लिहिलेली असतात. आपल्या देशाचा अभिमान असलेला एखादा मजकूर लिहिलेली रिक्षा सहसा दिसत नाही. मात्र, अशोक नागभुजंगे यांची रिक्षा याला एक अपवाद ठरत आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांच्या प्रयत्नाला सलाम करावा, यासाठी रिक्षावर चांद्रयान-२ असे लिहिल्याचे रिक्षाचालक नागभुजंगे यांनी सांगितले.

अशोक नागभुजंगे यांचा मुलगा आठवीमध्ये शिकतो. वृत्तपत्र, दूरचित्रवाणी आणि शाळेमधून त्याला चांद्रयानाची माहिती मिळाली. त्याने आपल्या वडिलांना रिक्षावर चांद्रयान-२ लिहा, असे सांगितले. अशोक नागभुजंगे यांना रिक्षावर इतर क ाहीतरी लिहिण्याची इच्छा नव्हती. वृत्तपत्रातून त्यांना चांद्रयानाची माहिती आधीच मिळाली होती. आपले शास्त्रज्ञ चांद्रयान-२ मोहीम राबविण्यासाठी दिवस-रात्र कष्ट घेत आहेत. त्यांच्या कष्टाप्रति आदरभाव म्हणून तसेच आपल्या मुलाची इच्छा म्हणून त्याने चांद्रयान-२ असे आपल्या रिक्षावर लिहिले. 

७ सप्टेंबर, २०१९ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार १:५२ वाजता हे चांद्रयान उतरत असताना चंद्रतलापासून २,१०० मीटर उंचीवर होते, त्यावेळी यानाशी संपर्क तुटला. हे यान कोसळले असल्याची शक्यता आहे. ‘इस्त्रो’ची महत्त्वाकांक्षी मोहीम असलेल्या ‘चांद्रयान-२’च्या अखेरच्या टप्प्यात चांद्रभूमीपासून केवळ २.१ कि.मी. उंचीवर असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने देशभरातील खगोलप्रेमींना आणि भारतीय शास्त्रज्ञांना धक्का बसला. यामुळे अशोक  नागभुजंगे यांना देखील वाईट वाटले. मात्र ते अजूनही आशावादी आहेत.

‘चांद्रयान-२’चे सोलापूरकरांना आकर्षण- गगनयान ही भारताची एक अंतराळ मोहीम आहे. ही मोहीम इस्रोतर्फे राबविली जात आहे. या मोहिमेद्वारे भारतीय अंतराळवीर अवकाशात राहणार आहेत. ही मोहीम तीन ते चार वर्षात पूर्ण होणार आहे. यासाठी सरकारने पैशांची तरतूद केली असल्याचे अशोक नागभुजंगे यांनी सांगितले. एकूणच सोलापूरकरांना चांद्रयान-२ या मोहिमेविषयी आकर्षण आहे. गणेशोत्सव व नवरात्रीमध्येही काही मंडळांनी ‘चांद्रयान-२’चा देखावा साकारला होता. दसºयाच्या मिरवणुकीत शाहीर वस्ती येथील जागृती नवरात्र महोत्सव मंडळाने चांद्रयान-२ व क्षेपणास्त्राचा देखावा सादर केला होता.

चांद्रयान पूर्णपणे अयशस्वी झाले, असे मला वाटत नाही. आपल्या देशातील शास्त्रज्ञांचे कष्ट वाया जाणार नाहीत, असे मला मनोमन वाटते. शास्त्रज्ञ के. सीवन व त्यांची टीम अजूनही ‘चांद्रयान-२’शी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. चांद्रयान-२ मोहिमेने भारतीयांच्या मनात घर केले असल्याने तेच मी माझ्या रिक्षावर लिहिले. अनेक प्रवासी रिक्षावर चांद्रयान-२ का लिहिलात असे विचारतात. त्यावेळी चांद्र्रयान-२ मोहिमेबाबतचा आनंद द्विगुणित होतो.- अशोक नागभुजंगेरिक्षाचालक.

टॅग्स :SolapurसोलापूरNASAनासाauto rickshawऑटो रिक्षा