शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'राज्याच्या तिजोरीत खडखडाट', कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकार होणार कर्जबाजारी; खुद्द 'या' मंत्र्यांनीच दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 19:46 IST

निवडक खाती वगळता अनेक खात्यांच्या निधीला 60 ते 70 टक्क्यापर्यंत कात्री लावावी लागणार असल्याची स्थिती

ठळक मुद्दे ‘सारथीै’ बंद होणार नसल्याचा खुलासा 

पुणे: कोरोनामुळे राज्याच्या महसूलात प्रचंड घट झाली असून शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी सुध्दा राज्य शासनाला आता कर्ज काढावे लागणार आहे.कोरोनासाठी शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. मात्र, काही निवडक खाती वगळता अनेक खात्यांच्या निधीला 60 ते 70 टक्क्यापर्यंत कात्री लावावी लागणार असल्याची स्थिती आहे. त्यामुळे सारथी संस्थेच्या विद्यार्थ्यांना निधीचे वाटप करताना विलंब होत आहे. परंतु, कोणत्याही परिस्थितीत सारथी संस्था बंद केली जाणार नाही. काही व्यक्ती विनाकारण याबाबत गैरसमज पसरवत राजकारण करत आहेत,असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी स्पष्ट केले.  आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागासह सारस्थी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह सारस्थी संस्थेचे अध्यक्ष  किशोरराजे निंबाळकर आदी उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले, कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले असून शासनाकडे जमा होणा-या महसूलातही मोठी घट झाली आहे. त्यातच कोरोनाच्या संकटासह निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना व शेतक-यांना मोठी मदत केली जात आहे. त्यामुळे शासनाच्या अनेक विभागांच्या निधीला कात्री लावली जाणार आहे. परंतु, शासनाकडून प्राध्यन्याने कोरोना योद्ध्यांचे वेतन दिले जाईल इतर कर्मचा-यांच्या वेतनात पुढे मागे होऊ शकते.सारथी संस्थेबाबत काही जण गैरसमज पसरवून त्याचे राजकारण करत आहेत,असा आरोप करून वडेट्टीवार म्हणाले, सारथी संस्था कोणत्याही परिस्थितीत बंद केली जाणार नाही. उलट दरवर्षी पाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना सारथीमधून प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले जाणार आहे. सारथीमधून एकाही कर्मचा-यांला काढले नाही. काही कर्मचारी स्वत:हून काम सोडून गेले आहेत.आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे सारथीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची व कर्मचा-यांच्या वेतनाची रक्कम देण्यासाठी आवश्यक असलेले 36 कोटी रुपए मंत्रीमंडळासमोर विषय मांडून मंजूर करून घेतले जातील.त्यानंतर वितरित करण्यात येईल.तसेच सारथी संस्थेच्या कारभाराच्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यावर मंत्रीमंडळासमोर ठेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल.दरम्यान, अनेक वेळा आंदोलन व उपोषण करूनही सारथीचे प्रश्न सुटत नसल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबर बैठक आयोजित करावी,या मागणीचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विजय वडेट्टीवार यांना देण्यात आले.

......

केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला कोणताही निधी मिळालेला नाही. विरोधांकडून करण्यात आलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. महाराष्ट्राच्या मातीशी बेईमानी करून पीएमफंडमध्ये मदत निधी जमा करणारे खरे महाराष्ट्र द्रोही आहेत, अशी टिकाही यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEmployeeकर्मचारी