शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

हॉटेल,बारच्या नुतनीकरणातील पोलिसांचा अडथळा दूर, ‘एनओसी’ची गरज नाही, गृह विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 20:00 IST

वस्तू सेवा कराच्या(जीएसटी)जाचक अटीमुळे काहीस्या अडचणीत सापडलेल्या राज्यातील हॉटेल, बार, परमिटरुम व रेस्टॉरंटच्या मालकासाठी एक खुशखबर आहे.

- जमीर काझी मुंबई - वस्तू सेवा कराच्या(जीएसटी)जाचक अटीमुळे काहीस्या अडचणीत सापडलेल्या राज्यातील हॉटेल, बार, परमिटरुम व रेस्टॉरंटच्या मालकासाठी एक खुशखबर आहे. आपल्या अस्थापनाच्या नुतनीकरणाच्या परवान्यासाठी त्यांना आता संबंधित पोलीस ठाण्यात येरझा-या घालाव्या लागणार नाही. त्यासाठी आता ‘ना हरकत दाखल्या’ची (एनओसी) आवश्यकता भासणार नाही.जिल्हाधिकारी कार्यालयातून त्याच्या विना त्यांना लायसन्स दिले जाणार आहे.परवानाच्या नुतनीकरणासाठी पोलिसांकडून ‘एनओसी’ घेताना बार व हॉटेल मालकांना नाहक वेठिस धरले जात असल्याच्या तक्रारी संघटनेच्यावतीने वारंवार केल्या जात होत्या.त्याचप्रमाणे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यामध्येही नुतनीकरणासाठी पोलिसांच्या मंजुरी घेण्याची तरतूद नाही, त्यामुळे यापुढे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.जीएसटी लागू झाल्यानंतर गेल्या काही महिन्यामध्ये हॉटेल व परमिटवाल्याच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांना थोडा फार दिलासा मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.हॉटेल, परमिटरुम व रेस्टॉंरट सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क विभागाने नमुद केलेल्या अटी व नियमांची पूर्तता करुन त्यासाठी परवाना घ्यावा लागतो. त्यासाठी पहिल्यादा संबंधित हद्दीतील पोलीस ठाण्यातून परवानगी घ्यवी लागते. त्यामध्ये संबंधित हॉटेल, बार चालकाचा पूर्व चारित्र्य, त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे तसेच जातीय व इतर दंगलीच्या अनुषंगाने परिसरातील कायदा व सुव्यस्थेचा आढावा घेवून परवानगीबाबतचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे एकदा सर्व बाबींची पडताळणी केली जात असताना पुन्हा नुुतनीकरणासाठी त्या सर्व चाचण्याचे सोपास्कार पार पाडण्याची आवयकता नाही, पोलिसांशी ‘अर्थ’पूर्ण चर्चा केल्याशिवाय ‘एनओसी’ दिली जात नाही, अशी ओरड बार मालकांकडून केली जात होते. त्यामुळे हा त्रास टाळण्याची मागणी वारंवार होत होती. राज्य सरकारने त्याला आता सकारात्मक प्रतिसाद दिला असून परवाना नुतनीकरणासाठी आता पोलिसांचा ‘ना हरकत’ घेतला जावू नये, असे आदेश गृह विभागाकडून काढण्यात आले आहेत. त्याबाबत राज्यातील पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, अधीक्षक,सर्व जिल्हाधिकाºयांना सूचना करण्यात आल्या असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले. पोलिसांची ‘अर्थ’पूर्ण चर्चाएखाद्या हॉटेल, बारच्या परवानगीसाठी ‘एनओसी’ घेण्यासाठी संबंधित हद्दीतील पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलपासून ते वरिष्ठ निरीक्षक आणि सहाय्यक आयुक्त ते उपायुक्त कार्यालयापर्यत हात ‘ओले’ करावे लागतात, त्यासाठी अर्ज पुढे पाठविला जात नसल्याची परिस्थिती आहे. काही मोजक्या अधिका-यांचा अपवाद वगळता सरसकट ‘अर्थ’पूर्ण चर्चा करावीच लागते. त्याचबरोबर दर महिन्याला ठराविक हप्ता बांधून द्यावा लागतो, असे बार मालकांच्याकडून सांगण्यात आले. यापुढे बार, हॉटेलचे लायसनला मंजुरी मिळण्यापूर्वीच संबंधित व्यक्तीची पूर्व चारित्र्य, परिसरातील कायदा व सुव्यवस्था, जातीय व अन्य दंगलीबाबत काटेकोर माहिती घेवून मंजूरी द्यावी, नुतनीकरणासाठी अशा पडताळणीची आवश्यकता नाही, अशा सूचना पोलीस विभागाला देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :hotelहॉटेलMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार