शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

नितीन गडकरी यांच्या कबुलीमुळे देशातील बेरोजगारीवर शिक्कामोर्तब, अशोक चव्हाण यांची टीका  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 8:28 PM

 देशात नोक-याच उपलब्ध नाहीत, अशी जाहीर कबुली देऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील वाढत्या बेरोजगारीवर शिक्कामोर्तब केल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई - देशात नोक-याच उपलब्ध नाहीत, अशी जाहीर कबुली देऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील वाढत्या बेरोजगारीवर शिक्कामोर्तब केल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. काँग्रेस पक्षाने वारंवार हा मुद्दा उपस्थित केला. मात्र सरकारने धादांत खोटी आकडेवारी देऊन रोजगारनिर्मितीबाबत देशाची दिशाभूल केली. आता नितीन गडकरी यांनीच नोकऱ्या कुठे आहेत? असा सवाल करून सरकारचा खोटेपणा चव्हाट्यावर आणला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच गडकरी यांच्या प्रश्नाबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.

एकिकडे नितीन गडकरी नोकऱ्या नाहीत असे सांगतात. तर दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुमारे 24 लाख पदे रिक्त आहेत. यावरून सरकारने नोकरभरती थांबवून कंत्राटी पध्दत राबवण्यास सुरु केल्याचे स्पष्ट झाले आहे. एकिकडे सरकारी नोकरभरती होत नाही. दुसरीकडे मोदी सरकारची चुकीची धोरणे आणि नोटाबंदीच्या अविचारी निर्णयामुळे खासगी क्षेत्रातील रोजगार निर्मिती ठप्प झाली आहे. देशातील बेरोजगारांनी याविरूद्ध आक्रोश केला असता पंतप्रधान त्यांना पकोडे विकण्याचा सल्ला देतात, अशी बोचरी टीकाही खा. अशोक चव्हाण यांनी केली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणNitin Gadkariनितीन गडकरी