शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

भाजपानं नवी जबाबदारी देताच नितेश राणेंनी संजय राऊतांना दिला निर्वाणीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 14:50 IST

नारायण राणे हे बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून ३९ वर्ष होते. त्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्यामुळे यापुढे जपून बोलावे असं त्यांनी म्हटलं. 

सिंधुदुर्ग - भाजपानं मला एक जबाबदारी दिलीय, सकाळचा भोंगा जो कुणाला आवडत नाही त्याची हवा काढण्याची जबाबदारी वरिष्ठांनी माझ्यावर टाकली आहे. त्यामुळे आजपासून भाजपाचे प्रमुख नेते नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर सगळेच, त्यांच्यावर संजय राऊत यांनी कुठलाही खोटानाटा आरोप केला. खालची पातळी वापरली, अपशब्द वापरला तर मग संजय राऊतांनी माझी पत्रकार परिषद आर्वजून ऐकावी. नितेश राणेंनी मला इशारा दिला नव्हता हे परत बोलू नये. यापुढे आमच्या कुठल्याही नेत्यावर खोटे बोलला तर आम्ही बाळासाहेबांचे ओरिजनल शिवसैनिक आहोत. संजय राऊतांसारखे चायनिज मॉडेल नाही. जर आमच्या पक्षाच्या नेत्यांवर बोलले तर मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंचे कपडे अंगावर ठेवणार नाही. टराटरा फाडीन असा निर्वाणीचा इशारा भाजपा आमदार नितेश राणेंनी खासदार संजय राऊतांना दिला आहे. 

नितेश राणे यांनी माध्यमांना सांगितले की, राऊतांनी शिवसेनेबद्दल आणि बाळासाहेबांबद्दल बोलणे हे त्यांची लायकी धरून नाही. त्यामुळे यापुढे विचार करून बोलावे. संजय राऊतांसारखी माणसे बाजारात विकत मिळतात. राऊत बोलले तर अर्धा तासात उद्धव आणि आदित्यची सगळी कपडे फाडणार. आता त्यांनी ठरवावे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची किती इज्जत ठेवायची. किती कपडे अंगावर ठेवायचे हे त्यांच्या हातात आहे. नारायण राणे हे बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून ३९ वर्ष होते. त्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्यामुळे यापुढे जपून बोलावे असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत तुम्हाला भ्रष्टाचाराची इतकी खुमखुमी आहे. भाजपात आल्यावर कारवाई बंद करते असं वाटत असेल तर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आहे तिकडून ऑर्डर आणा, तुमचे हात कुणी बांधले नाहीत. माध्यमांसमोर आरोप का करताय? भ्रष्टाचाराचा आरोप उद्धव ठाकरेंवरही झालाय, खूनाचा आरोप आदित्य ठाकरेंवर झालाय. नंदकिशोर चर्तुवेदी, पाटणकर यांचेही भ्रष्टाचार आहेत. ठाकरे कुटुंब आणि जुहूला राहणारे जस्त्रा यांचे काय संबंध हेदेखील बाहेर येईल. दिशा सालियनचे प्रकरण समोर येईल. ते ऐकण्याची तयारी ठेवावी असं नितेश राणे म्हणाले. 

पहिले पाऊल आम्ही टाकणार नाहीनारायण राणेंचे नाव घेऊन मला घाबरवण्याची हिंमत करू नये. तु राणेंना ओळखले नाहीत. राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा कारमध्ये रामदास कदमांना बसवल्याशिवाय उद्धव घराबाहेर पडत नव्हते. रामदास कदम हे बोललेत. यापुढे विचार करून बोलावे. कुठेही पातळी सोडून बोलाल तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल काय काय बाहेर येईल तूच विचार कर. तुझ्यामुळे ठाकरेंची अंडीपिल्ली बाहेर येतील हे राज्याला कळू द्या. पहिले पाऊल संजय राऊत टाकतील आणि आम्ही टाकणार नाही असंही नितेश राणेंनी स्पष्ट केले. 

राऊतांवर देशद्रोहाचा खटला भरा सत्यपाल मलिक कोण ज्याचे सध्या पाकिस्तान सरकार गोडवे गातंय. सत्यपाल मलिक खरे बोलत असतील तर हा भारताचा खरा चेहरा आहे असं जगात म्हटलं जातंय. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी होतेय. त्या माणसाला भेटायला संजय राऊत जातायेत. स्वत:ला देशभक्त म्हणवतात आणि जो माणूस देशाची बदनामी करतोय त्याला भेटण्यासाठी जातोय. राऊतांवर देशद्रोहाचा खटला भरा, देशाविरोधी कारवाया करणाऱ्यांना मदत करतायेत अशी मागणी नितेश राणेंनी केली. 

आजपासून चौकटीत राहायचे राऊत म्हणतात, बेळगावात मराठी माणसांसाठी मी ३ मे ला जाणार आहे. मग पत्राचाळीत पाकिस्तानी राहत होते का? असा सवाल नितेश राणेंनी करत पत्राचाळीतील सभासदांना घेऊन मी बेळगावात येतो. कोण मराठी माणूस खरा बोलतो ते पाहू दे. पत्राचाळीतील माणसांचे पैसे यांनी खाल्ले. पहिले या मराठी माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न कर. त्यामुळे आजपासून चौकटीत राहायचे असंही राणे बोलले. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे