शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

Nitesh Rane Exclusive: "राणे-राज-उद्धव हे एकत्र आले असते तर...; परंतु ‘त्या’ लोकांना हे नकोय", नितेश राणेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 17:13 IST

राणेंना शिवसेनाबद्दल इतकं माहिती आहे की, काही घटना, आडनावं सांगितली तर  शिवसेनेला ते जड जाईल हे माहिती आहे.

ठळक मुद्देवैयक्तिक टीका झाली तर त्याला उत्तर देण्यास आम्हीही कमी पडणार नाहीबाळासाहेबांचे मन खूप मोठं होतं. बाळासाहेब देवमाणूस होते. उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार पडण्यास भाग पाडायचं यातून भलं कुणाचं होणार हे सगळ्यांना माहिती आहे

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे. नारायण राणे यांच्यावर टीका करण्याची संधी शिवसेनेचे नेते सोडत नाही. मात्र अशातच आमदार नितेश राणे यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात हाडवैर नाही तर ते बनवलं गेले. शिवसेनेतील काही मंडळी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना चुकीचं सांगत असतात. ती माणसं त्यांच्या लक्षात आली तर उद्धव ठाकरेंचे भले होईल असं नितेश राणे म्हणाले आहे.

भाजपा आमदार नितेश राणे(BJP Nitesh Rane) यांनी सांगितले की, कोरोना काळात आमच्या हॉस्पिटलच्या उद्धाटनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांची शेवटची भेट झाली. मी आणि आदित्यही एकदा भेटलो होते. आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मुळात राणेसाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगले नाते होते. आम्ही तेजस, आदित्य बरोबर खेळलो आहे. परंतु संजय राऊत, सुभाष देसाई आणि अनिल परब यासारखी काही मंडळी आहे. ज्यांना हे नकोय. राणे-राज-उद्धव एकत्र असते तर आज महाराष्ट्रासाठी वेगळं चित्र असतं. उद्धव ठाकरेंना कोण जवळचं आहे हे ओळखता आलं तर आदित्य आणि शिवसेनेसाठी चांगले आहे. संजय राऊतांनी लोकप्रभात असताना सातत्याने बाळासाहेब-मासाहेब यांच्यावर टीका केली होती. ज्या दिवशी संजय राऊतांबद्दल उद्धव ठाकरे यांना कळेल तेव्हा त्यांचे भलं होईल असं ते म्हणाले आहेत.

तसेच राणेंना शिवसेनाबद्दल इतकं माहिती आहे की, काही घटना, आडनावं सांगितली तर  शिवसेनेला ते जड जाईल हे माहिती आहे. परंतु राजकारण हे राजकारणासाठी असतं. वैयक्तिक टीका झाली तर त्याला उत्तर देण्यास आम्हीही कमी पडणार नाही. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. जर महाराष्ट्र हिताच्या दृष्टीने, तरुणांच्या रोजगाराबद्दल काही सकारात्मक प्रस्ताव घेऊन यायचे असतील. तर निश्चितच नारायण राणे(Narayan Rane) हे त्यासाठी पुढाकार घेतील असंही नितेश राणे यांनी सांगितले.

दरम्यान, संजय राऊत(Sanjay Raut) यांनी लोकप्रभामध्ये असताना मासाहेबांवर टीका केली होती. बाळासाहेबांबद्दल टीका करत होते. संजय राऊत हे पवारांसाठी काम करतात हे सगळ्यांना माहिती आहे. सामनाची जबाबदारी बाळासाहेबांनी राऊतांवर दिली कारण बाळासाहेबांचे मन खूप मोठं होतं. बाळासाहेब देवमाणूस होते. संजय राऊत यांचा उद्देश समजून घ्यायला पाहिजे. पवारांचं काम संजय राऊत करतायेत. नारायण राणे यांना डिवचायचं आणि ठाकरेंविरोधात बोलायला लावायचं, मग अनेक प्रकरण बाहेर काढायची. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार पडण्यास भाग पाडायचं यातून भलं कुणाचं होणार हे सगळ्यांना माहिती आहे असंही नितेश राणे यांनी सांगितले.   

पाहा व्हिडीओ

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNarayan Raneनारायण राणे Nitesh Raneनीतेश राणे Sanjay Rautसंजय राऊतAnil Parabअनिल परबUddhav Thackerayउद्धव ठाकरे