शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

Nitesh Rane Exclusive: "राणे-राज-उद्धव हे एकत्र आले असते तर...; परंतु ‘त्या’ लोकांना हे नकोय", नितेश राणेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 17:13 IST

राणेंना शिवसेनाबद्दल इतकं माहिती आहे की, काही घटना, आडनावं सांगितली तर  शिवसेनेला ते जड जाईल हे माहिती आहे.

ठळक मुद्देवैयक्तिक टीका झाली तर त्याला उत्तर देण्यास आम्हीही कमी पडणार नाहीबाळासाहेबांचे मन खूप मोठं होतं. बाळासाहेब देवमाणूस होते. उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार पडण्यास भाग पाडायचं यातून भलं कुणाचं होणार हे सगळ्यांना माहिती आहे

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे. नारायण राणे यांच्यावर टीका करण्याची संधी शिवसेनेचे नेते सोडत नाही. मात्र अशातच आमदार नितेश राणे यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात हाडवैर नाही तर ते बनवलं गेले. शिवसेनेतील काही मंडळी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना चुकीचं सांगत असतात. ती माणसं त्यांच्या लक्षात आली तर उद्धव ठाकरेंचे भले होईल असं नितेश राणे म्हणाले आहे.

भाजपा आमदार नितेश राणे(BJP Nitesh Rane) यांनी सांगितले की, कोरोना काळात आमच्या हॉस्पिटलच्या उद्धाटनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांची शेवटची भेट झाली. मी आणि आदित्यही एकदा भेटलो होते. आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मुळात राणेसाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगले नाते होते. आम्ही तेजस, आदित्य बरोबर खेळलो आहे. परंतु संजय राऊत, सुभाष देसाई आणि अनिल परब यासारखी काही मंडळी आहे. ज्यांना हे नकोय. राणे-राज-उद्धव एकत्र असते तर आज महाराष्ट्रासाठी वेगळं चित्र असतं. उद्धव ठाकरेंना कोण जवळचं आहे हे ओळखता आलं तर आदित्य आणि शिवसेनेसाठी चांगले आहे. संजय राऊतांनी लोकप्रभात असताना सातत्याने बाळासाहेब-मासाहेब यांच्यावर टीका केली होती. ज्या दिवशी संजय राऊतांबद्दल उद्धव ठाकरे यांना कळेल तेव्हा त्यांचे भलं होईल असं ते म्हणाले आहेत.

तसेच राणेंना शिवसेनाबद्दल इतकं माहिती आहे की, काही घटना, आडनावं सांगितली तर  शिवसेनेला ते जड जाईल हे माहिती आहे. परंतु राजकारण हे राजकारणासाठी असतं. वैयक्तिक टीका झाली तर त्याला उत्तर देण्यास आम्हीही कमी पडणार नाही. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. जर महाराष्ट्र हिताच्या दृष्टीने, तरुणांच्या रोजगाराबद्दल काही सकारात्मक प्रस्ताव घेऊन यायचे असतील. तर निश्चितच नारायण राणे(Narayan Rane) हे त्यासाठी पुढाकार घेतील असंही नितेश राणे यांनी सांगितले.

दरम्यान, संजय राऊत(Sanjay Raut) यांनी लोकप्रभामध्ये असताना मासाहेबांवर टीका केली होती. बाळासाहेबांबद्दल टीका करत होते. संजय राऊत हे पवारांसाठी काम करतात हे सगळ्यांना माहिती आहे. सामनाची जबाबदारी बाळासाहेबांनी राऊतांवर दिली कारण बाळासाहेबांचे मन खूप मोठं होतं. बाळासाहेब देवमाणूस होते. संजय राऊत यांचा उद्देश समजून घ्यायला पाहिजे. पवारांचं काम संजय राऊत करतायेत. नारायण राणे यांना डिवचायचं आणि ठाकरेंविरोधात बोलायला लावायचं, मग अनेक प्रकरण बाहेर काढायची. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार पडण्यास भाग पाडायचं यातून भलं कुणाचं होणार हे सगळ्यांना माहिती आहे असंही नितेश राणे यांनी सांगितले.   

पाहा व्हिडीओ

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNarayan Raneनारायण राणे Nitesh Raneनीतेश राणे Sanjay Rautसंजय राऊतAnil Parabअनिल परबUddhav Thackerayउद्धव ठाकरे